
Crime News: ऑनलाइन मैत्री… मग गुप्त माहितीचा खेळ! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, किन्होळा येथील शेतकरी राजेंद्र व गजानन लक्ष्मण बाहेकर हे आपल्या शेतातील मिरची पोत्यांमध्ये भरून जाफ्राबाद येथील बाजारात विक्रीसाठी गेले होते. मिरचीचा लिलाव झाल्यानंतर ते मालवाहू वाहनाने किन्होळ्याकडे परतत होते. वाहन शेख मिसार शेख मैहमूद चालवत होते. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास हातणी गावाच्या मागे त्यांच्या वाहनासमोर २ दुचाकी जात होती. पुढे जाण्यासाठी जागा मिळावी म्हणून चालकाने हॉर्न वाजवला.
हल्लेखोरांनी त्यांच्या उजव्या हातावर व डोक्यावर काठीने प्रहार केला, जबर मार लागल्याने ते खाली कोसळले, त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या गजानन यांच्यावरही हल्लेखोरांनी काठ्यांनी मारहाण केली. त्यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, छातीवर व दोन्हीं पायावर मारहाण करण्यात आली. तसेच चालक शेख मिसार यांना शिवीगाळ करून पाठीवर व कमरेवर मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच भगवान बाहेकर हे घटनास्थळी पोहोचले. त्यांना पाहताच हल्लेखोर हातणीच्या दिशेने अंधाराचा फायदा घेत पसार झाले, जखमींवर प्रथम बुलढाणा येथे उपचार करण्यात आले, त्यानंतर राजेंद्र बाहेकर यांनी चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, चिखली पोलिसाकडून पुढील तपास सुरू आहे.