Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… तर काँग्रेस जिंकूच शकत नाही”; राहुल गांधींच्या ‘फिक्सिंग’च्या आरोपाला फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभ निवडणूक झाली होती. या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दणकून पराभव केला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 07, 2025 | 06:02 PM
“… तर काँग्रेस जिंकूच शकत नाही”; राहुल गांधींच्या ‘फिक्सिंग’च्या आरोपाला फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत ज्या प्रकारे फिक्सिंग करण्यात आली त्याच प्रकारे आता बिहारमध्ये केली जाईल अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

बिहारमध्ये या वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होण्याचा अंदाज आहे. बिहारमध्ये भाजप ज्या ज्या ठिकाणी पराभूत होईल त्या ठिकाणी फिक्सिंग ब्ल्यू प्रिंट वापरली जाईल असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी म्हणाले, ” फिक्स केलेल्या निवडणुका लोकशाहीसाठी विष म्हणून कार्यरत राहतात. एखादा पक्ष फसवणूक करून निवडणूक जिंकत असेल, मात्र त्याने लोकशाही कमकुवत होते. जनतेचा विश्वास देखील कमी होतो.

राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवणे, खोटे मतदार उभे करणे याबाबत आरोप केले आहेत. त्यानंतर याबाबतचे पुरावे लपवण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

राहुल गांधी यांनी महाराष्ट विधानसभा निवडणुकीबाबत केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी यांनी बिहारमध्ये आपला पराभव स्वीकार केला आहे. जोवर राहुल गांधी तथ्य समजून घेत नाहीत आणि स्वतः खोटे बोलणे बंद करत नाहीत तोवर त्यांचा पक्ष कधीही जिंकू शकत नाही.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभ निवडणूक झाली होती. या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दणकून पराभव केला होता. महायुतीने प्रचंड मोठे बहुमत प्राप्त केले. नवीन सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले आहेत.

मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सपशेल पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला एकत्रपणे ५० पेक्षा जास्त जागा जिंकत्या आलेल्या नाहीत. निकाल लागल्यापासून राहुल गांधी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत.

यावर्षीच्या अखेरीस बिहारमध्ये देखील विधानसभेची निवडणूक होणार आहे. काँग्रेस, भाजप आणि अन्य सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभेच्या निकालात जसे फिक्सिंग झाले तसेच बिहारमध्ये भाजप पराभूत होईल त्या ठिकाणी करेल असा आरोप करत आहेत. या आरोपांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Web Title: Cm devendra fadnavis reply to rahul gandhi about allegation of maharashtra and bihar assembly election politics news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 06:01 PM

Topics:  

  • Bihar Election
  • devendra fadnavis
  • Maharashtra Election
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

RTI कायद्यातील बदलांना तूर्तास स्थगिती; मुख्यमंत्री म्हणाले, ‘अण्णांशी चर्चा होईपर्यंत नवे नियम…’
1

RTI कायद्यातील बदलांना तूर्तास स्थगिती; मुख्यमंत्री म्हणाले, ‘अण्णांशी चर्चा होईपर्यंत नवे नियम…’

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
2

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
3

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

Amol Kolhe News:  सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं
4

Amol Kolhe News: सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.