
नेरळमधील व्यापारी संकुल लवकरच खुले होणार, १०४ गाळ्यांचे वाटप करण्यासाठी निविदा
कर्जत: रायगड जिल्हा परिषदेचे माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या नेरळ संकुल विकास प्राधिकरण यांनी बांधलेले व्यापारी संकुलात लवकरच बाजार भरणार आहे.या संकुलातील 104 गाळ्यांचे वितरण करण्यासाठी जिल्हा परिषदेने निविदा काढण्यात आली आहे.दरम्यान या निविदा प्रक्रिया मध्ये नेरळ संकुलात नक्की टपरी धारक यांना गाळे मिळणार की अन्य कोणाला याबाबत खुलासा नसल्याने नेरळ गावातील फुटपाथ रिकामे होणार का? हा प्रश्न काय आहे.
नेरळ संकुल प्राधिकरणाने नेरळ बाजारपेठेत व्यापारी संकुल बांधले आहे.या संकुलाचे बांधकाम २०२२ मध्ये पूर्ण झाले असून मागील तीन वर्षे संकुल बंद आहे.रायगड जिल्हा परिषदेत सदस्य मंडळ नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकुलातील गाळ्यांचे वाटप केले जात नव्हते. साधारण अडीच कोटी खर्चून बांधलेले या संकुलातील गाळ्यांचे वाटप नेरळ बाजारपेठ मधील रस्ता रुंदीकरण करताना रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या टपरीधारक यांना देण्यात येणार होते.रस्त्यावरील टपऱ्या तोडण्यात आल्यानंतर नेरळ गावातील रस्ते तयार करण्यात आले.
मात्र त्यामुळे नेरळ गावातील बाजारपेठ मधील वाहतूक कोंडी टपरी धारक यांच्या कडून फुटपाथ अडवल्याने आजही कायम आहे.टपरी धारक यांच्यासाठी बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलात अद्याप पर्यंत टपरीधारक यांना गाळे देण्यात आले नाहीत.गाळे मिळावे यासाठी अनेक वेळा टपरी धारक नेरळ ग्रामपंचायत आणि रायगड जिल्हा परिषद मध्ये जाऊन आले आहेत.त्या त्या वेळी सदस्य
मंडळ नसल्याने व्यापारी संकुलातील गाळ्यांचे वितरण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही असे सांगितले जात होते.
मात्र १७ ऑक्टोबर रोजी रायगड जिल्हा परिषदेने व्यापारी संकुल मधील १०४ गाळ्यांचे वाटप करण्यासाठी इ निविदा काढली आहे.ही निविदा काढताना एक एक गाळा वाटप करण्यात येईल अशी निविदा काढलेली नाही तर एकावेळी १०४ गाळ्यांचे वाटप ठेकेदाराला केले जाणार आहे.त्यानंतर संबंधित ठेकेदार हा भाडेतत्वावर गाळे देणार आहे.एक एक गाळा घेता येणार नसल्याने व्यापारी संकुलातील गाळे ठेकेदाराच्या घशात घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप नेरळ मधील मूळचे टपरीधारक यांच्याकडून केला जात आहे.
मागील महिन्यात रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी नेरळ गावातील व्यापारी संकुलाची पाहणी केली होती.त्यानंतर लगेच त्या संकुलातील गाळ्यांचे वाटप करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.यापूर्वी अनेक वर्षे जिल्हा परिषदेत सत्ता नसल्याने हा धोरणात्मक निर्णय त्या त्या काळातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला नव्हता.तर मग आजही रायगड जिल्हा परिषदेत सदस्य मंडळ अस्तित्वात नसताना देखील नेरळ व्यापारी संकुलातील गाळ्यांचे वाटप केले जाणार आहे.हे कोणत्या नियमाला धरून असल्याचं प्रश्न व्यापारी संकुलात गाळा मिळेल या आशेवर असलेली टपरीधारक यांना पडला आहे.पूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असा धोरणात्मक निर्णय सदस्य मंडळ अस्तित्वात आल्यावर घेईल असे सांगत असताना सध्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी हा निर्णय घेतल्याने टपरीधारक नाराज आहेत.एवढे वर्षे आम्हाला टपरी ऐवजी गाळे देण्याचे दिलेले आश्वासन ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद का पाळत नाहीत? असा प्रश्न टपरी धारक उपस्थित करीत आहेत.
व्यापारी संकुलातील आता गाळ्यांचे होणारी प्रक्रिया ही आणखी काही महिने थांबवावी.दोन महिन्यात जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार असताना व्यापारी संकुलातील गाळ्यांचे वाटप करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे.ही निविदा प्रक्रिया त्वरित थांबवावी अशी मागणी नेरळ मधील टपरी धारक करीत आहेत.