खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतला कल्याण रिंग रोड प्रकल्पाचा आढावा
कल्याण – डोंबिवली आणि टिटवाळा या दोन्ही शहरांतील अंतर केवळ १५ ते २० मिनिटांत गाठता यावे यासाठी कल्याण रिंग रोड प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. हा प्रकल्प एकूण ८ टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. यापैकी टप्पा चार ते सात ( दुर्गाडी ब्रिज ते एसएच ३५-४० रोड जंक्शन ) अशा चार टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे दुर्गाडी ब्रिज ते एसएच ३५-४० रोड जंक्शन हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या सर्व कामाचा आढावा घेण्यासाठी आज कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए मुख्यालयात महत्वाची बैठक पार पडली. उर्वरित टप्प्यांचे काम देखील जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्या आहेत.
प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन देखील जलदगतीने करण्यात यावे, असे देखील खासदार डॉ.शिंदे यांनी या बैठकीवेळी सांगितलं. कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण भागाच्या वाहतुकीला अधिक गती प्राप्त करून देणारा कल्याण रिंग रोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या मार्गाच्या उभारणीनंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतुकीला एक नवा आयाम प्राप्त होणार आहे. हा प्रकल्प एकूण 8 टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. यापैकी टप्पा चार ते सात ( दुर्गाडी ब्रिज ते एसएच ३५-४० रोड जंक्शन ) अशा चार टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाच्या सद्यस्थितिचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली.
हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी, कल्याण डोंबिवली महानरपालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीवेळी खासदार डॉ.शिंदे यांनी दिल्या आहेत. कल्याण रिंग रोड प्रकल्पाची उभारणी ८ टप्प्यांमध्ये केली जाणार आहे.
यापैकी टप्पा – ४ (दुर्गाडी ब्रिज ते गांधारे ब्रिज), टप्पा – ५ (गांधारी ब्रिज ते मांडा जंक्शन), टप्पा – ६ (मांडा जंक्शन ते टिटवाळा जंक्शन), टप्पा – ७ (टिटवाळा जंक्शन ते एसएच ३५-४० रोड जंक्शन) या टप्प्यांचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे हे रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. टप्पा – ३ (मोठा गाव ब्रिज ते गोविंदवाडी रोड) या रस्त्याचे काम २०२६ पर्यंत ते पूर्ण करण्याचे ध्येय संबंधित अधिकाऱ्यांनी ठेवले आहे. तसेच टप्पा – १ (हेदुटणे ते शिळ रोड) आणि टप्पा – २ (शीळ रोड ते मोठागाव ब्रीज) या मार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन करून हे काम देखील २०२६ पर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. त्यामुळे २०२६ पर्यंत संपूर्ण कल्याण रिंग रोड प्रकल्याची उभराणी पूर्ण होईल.
कल्याण रोड रिंग प्रकल्पाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर काटई – टिटवाळा हे एक तासाचे अंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांवर येणार आहे. अवजड वाहनांची वाहतूक देखील या मार्गावरून होणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर भार येणार नाही. कल्याण रोड रिंग प्रकल्पामुळे शहरांतर्गत वाहतुकीला गती मिळेल.