Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवेंद्र फडणवीस हे उत्कृष्ट संघटक’; राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चांवर बावनकुळेंचे सूचक विधान

देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांवर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत सूचक विधान केलं आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 01, 2024 | 05:35 PM
चंद्रशेखर बावनकुळे यांचे सूचक विधान

चंद्रशेखर बावनकुळे यांचे सूचक विधान

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : लोकसभेची निवडणूक मागील महिन्यामध्ये पार पडली. यामध्ये आलेल्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व निकालाची जबाबदारी घेत राजकारणातून संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. याचबरोबर संघटनात्मक काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांवर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत सूचक विधान केलं आहे. केंद्रीय नेतृत्व योग्य तो निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी 1200 कोटीहून अधिक रुपयांचा निधी दिला. या जिल्ह्याच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजूरांसाठी, जिल्ह्यातील रस्त्यांसाठी, जिल्हा परिषदेच्या कामांसाठी तसेच जवळपास 75 वेगवेगळ्या विभागांसाठी विकास कामे केली जाणार आहेत. कधी काळी 200 कोटी रुपये नागपूरसाठी मिळायचे. मात्र, आता 1200 कोटी रुपये नागपूर जिल्ह्याला मिळाले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे आम्ही आभार मानतो”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

बावनकुळेंचं फडणवीसांबाबत सूचक विधान

“देवेंद्र फडणवीस हे उत्कृष्ट संघटक आहेत. शासन आणि प्रशासनामध्ये काम करण्याचा त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे संघटनेला मोठा फायदा होईल. मात्र, याबाबत केंद्रीय नेतृत्व योग्य तो निर्णय घेतील. पण माझ्या दृष्टीने केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतल्यास आम्हाला मान्य राहील. मात्र, महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेसाठी त्यांचं येथील सरकारमधील स्थान महत्वाचं आहे. तसंच संघटनेमधीलही स्थानही महत्वाचं आहे. त्यामुळे आम्हाला हेच वाटेल की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात राहावं. कारण ते आमचे नेते आहेत”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Devendra fadnavis the great organizer chandrashekhar bawankule statement nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2024 | 05:35 PM

Topics:  

  • BJP
  • chandrashekhar bawankule
  • devendra fadnvis

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
4

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.