Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News : रखडलेल्या रस्त्यांची कामे होणार सुरू : तब्बल इतक्या कोटींचा निधी मंजूर

शहरी आणि ग्रामीण रस्त्यांची होणारी दयनीय़ अवस्था त्यात होणारी वाहतूक कोंडी याचा नाहक त्रास नागरिकांना भोगावा लागतो. याच अनुषंगाने आता धाराशिव जिल्ह्यात रखडलेल्या रस्त्यांच्या कामाला मुहुर्त लागला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 26, 2025 | 05:47 PM
Dharashiv News : रखडलेल्या रस्त्यांची कामे होणार सुरू : तब्बल इतक्या कोटींचा निधी मंजूर
Follow Us
Close
Follow Us:
  • रखडलेल्या रस्त्यांची कामे होणार सुरू
  • नागरिकांच्य़ा समस्येवर तोडगा
  • नगरोत्थान योजनेतून विकासकामाला गती

धाराशिव : खड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हा प्रश्न गाव असो कि शहर स्थानिकांचा कायमच भेडसावतो. शहरी आणि ग्रामीण रस्त्यांची होणारी दयनीय़ अवस्था त्यात होणारी वाहतूक कोंडी याचा नाहक त्रास नागरिकांना भोगावा लागतो. याच अनुषंगाने आता धाराशिव जिल्ह्यात रखडलेल्या रस्त्यांच्या कामाला मुहुर्त लागला आहे. नगरोत्थान महाभियान योजनेतून शहरातील रस्तेविकासासाठी १४० कोटी रुपयांच्या कामांचा कार्यारंभ आदेश काढण्यात आला आहे. त्यातून शहरातील २६ किलोमीटर लांबीच्या ५९ रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे ऐरणीवर आलेला रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

Ahilyanagar : ‘एक पणती जवानांसाठी’ अहिल्यानगरात आजी माजी सैनिक आणि नागरिकांचा स्तुत्य उपक्रम

शहरातील भाजपा कार्यालयात शनिवारी २५ ऑक्टोबरला आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, शहराध्यक्ष अमित शिंदे, प्रवक्ते दत्ता देवळकर, युवराज नळे आदी यावेळी उपस्थित होते. मागील कांही वर्षांपूर्वी भूमिगत गटारींच्या कामासाठी शहरातील सर्व अंतर्गत रस्ते खोदण्यात आले होते. मात्र रस्त्यांची दुरुस्ती वेळेत न झाल्याने शहरवासीयांची अत्यंत गैरसोय झाली होती. आता. ज्या ठिकाणी भूमिगत गटारींचे काम पूर्ण झाले आहे. अशा सर्व ठिकाणी ही रस्त्यांची कामे होणार आहेत.

पाटील म्हणाले, नगरोत्थान योजनेतून या पूर्वी नळदूर्ग आणि तुळजापूर शहरातील रस्त्यांच्या कामासाठी २०२३ मध्ये निधी मिळाला. मात्र, काही कारणांमुळे धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामांचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. धाराशिवसाठी निधी आणण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी ही बाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली. त्यानुसार १४० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या निधीच्या कामांचा कार्यारंभ आदेश निघाला असून जुन्या दरानेच टेंडर निघाले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची बचत झाली आहे. योग्य नियोजन करून लवकरच कामे सुरू करण्यात येतील.

शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी दीड वर्षांची मुदत देण्यात आली आहे. ५९ रस्त्यांपैकी काही रस्ते नऊ मिटर रुंदीचे तर काही रस्ते १२ मिटर रुंदीचे आहेत. रस्ते होणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, असेही पाटील यांनी सांगितले. दरम्यान शहरातील चाळण झालेल्या रस्त्यांपासून नागरिकांची लवकरच सुटका होणार असून आगामी दीड वर्षांच्या कालावधीत शहरातील रस्ते बांधण्यात येणार आहेत. नगरपालिकेची आगामी निवडणूक दृष्टीपथात ठेऊन शासनाने ही घोषणा केली असली तरी दुरवस्था झालेल्या रस्त्यापासून नागरिकांची आगामी काळात सुटका होणार आहे. असे मत सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.

 

या ५९ कामांची मूळ किंमत ११६ कोटी ७० लाख ३३ हजार ३५८ आहे. त्यावर रॉयल्टी शुल्क ७२ लाख ८३ हजार ३६४ रुपये आहे. २१ कोटी ६६ हजारांची जीएसटी आहे. कामगारांच्या विम्यासाठी १ कोटी १६ लाख ७० हजार ३३४ रुपयांची तरतूद आहे. व्हीक्यूसीसी चाचणीचे शुल्क २२ लाख ६३ हजार ५९५ रुपयांचे आहे. विद्युत खांब आणि डीपी स्थलांतरसाठी २५ लाखांची तरतूद आहे. तर वृक्ष लागवडीसाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. अशी एकूण १४० कोटी इतकी या कामांची किंमत झाली आहे. या कामासाठी नगरपरिषद संचालनालयामार्फत राज्यस्तरीय मान्यता समितीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. छत्रपती संभाजी नगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे. १८ मे २०२३ला झालेल्या बैठकीपासून राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीच्या प्रशासकीय मंजुरीसाठी हा विषय विचाराधीन होता. त्यास अनुसरून २३ फेब्रुवारी २०२४ला प्रशासकीय मंजुरी दिल्याचा आदेश नगरविकास विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन आदेश काढला आहे.

लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

धाराशिव शहरातील रस्त्यांचा रखडलेला प्रश्न आता निकाली निघाला आहे. निविदेतील २०२३-२४ च्या अंदाजपत्रकीय दरानेच ही सगळी कामे होणार आहेत. त्यामुळे आजच्या दराची तुलना केली असता सरकारचे अर्थात जनतेचे जवळपास साठ कोटी रुपये वाचणार आहेत. लवकरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

Pune Jain Housing Board: जैन बोर्डिंग प्रकरणावरून एकनाथ शिंदेंचा धंगेकरांचा सल्ला; म्हणाले…

 

Web Title: Dharashiv news work on stalled roads to begin funds of rs 140 crore approved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 05:44 PM

Topics:  

  • Dharashiv
  • latest news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती
1

Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Election : ऑल इंडिया ख्रिश्चन फोरम कडून मोर्चे बांधणीला सुरुवात
2

Election : ऑल इंडिया ख्रिश्चन फोरम कडून मोर्चे बांधणीला सुरुवात

“तुमच्या जाण्यानंतर आयुष्य जणू थांबल्यासारखं वाटतंय”, प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचं अपघाती निधन,अभिनेत्रीची भावूक पोस्ट
3

“तुमच्या जाण्यानंतर आयुष्य जणू थांबल्यासारखं वाटतंय”, प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचं अपघाती निधन,अभिनेत्रीची भावूक पोस्ट

Mumbai : मीरा-भाईंदर शहर म्हणजे राजकीय प्रयोगशाळा नाही– प्रताप सरनाईक
4

Mumbai : मीरा-भाईंदर शहर म्हणजे राजकीय प्रयोगशाळा नाही– प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.