धारशिव तालुक्यातील करजखेडा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन कारभाऱ्यांनी २०१७ ते २०२२ या कालावधीत तब्बल ७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे. त्या काळात उपसरपंचासह तीन ग्रामसेवकांचे हात असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले
करजखेडा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन कारभाऱ्यांनी तब्बल सात कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे. त्या काळात सरपंचपद रिक्त असल्याने उपसरपंचासह तीन ग्रामसेवकांचे हात बरबटलेले असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.
बालाजी अमाईन्स या रासायनिक कारखान्यामुळे परिसरात गंभीर प्रदूषण होत असल्याच्या तक्रारींनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून, या प्रकरणाची सखोल तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Dharashiv News : धाराशिव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १२ गटांमध्ये तसेच पंचायत समितीच्या २४ गणांमध्ये एकूण २२० टपाली मते नोंदली गेली असून त्याची टक्केवारी ३०.८१ इतकी आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मुळे धाराशिव जिल्ह्याच्या उद्योग, पर्यटन आणि दळणवळण क्षेत्रात मोठी क्रांती होईल. टेक्स्टाईल पार्क आणि MSME हबमुळे रोजगार वाढणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
धाराशिव पोलिसांनी कठोर कारवाई करत चार डॉल्बी वाहनांवर तब्बल ४० लाख ७४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शहरात नुकत्याच पार पडलेल्या ऊरसात या डॉल्बी वाजविण्यात आल्या होत्या.
२४७ मतदान केंद्रांवर वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनची कमिशनिंग आणि सिलिंग प्रक्रिया उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली. या प्रक्रियेत २७४ कंट्रोल युनिट ४८ सीयू यांचा समावेश होता.
महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आता ५ फेब्रुवारीऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी केली.
भूजल व्यवस्थापन हे केवळ एका विभागापुरते मर्यादित न राहता सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून होणे आवश्यक आहे. पाणी पुनर्भरण प्रकल्प आणि दीर्घकालीन जलधोरणांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च येणाऱ्या या शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात मोफत अथवा अत्यल्प खर्चात झाल्याने गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी धाराशिव तालुक्यातील तेर आणि पळसप गटात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. जाणून घ्या सविस्तर बातमीत..
धाराशिव जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया अखेर जाहीर झाल्या असून जिल्ह्यात जिपच्या एकूण गटांची संख्या ५५ आहे. तर पंचायत समितीच्या ११० गणांतून ३९३ उमेदवार मैदानात आहेत.
धाराशिवच्या तेर जिल्हा परिषद गटातून अर्चना पाटील यांची अपक्ष उमेदवारी कायम राहिली आहे. भाजप हायकमांडने याला परवानगी दिल्याने राजकीय खळबळ उडाली असून, सक्षणा सलगर यांच्याशी त्यांची मुख्य लढत होण्याची शक्यता…
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त...
२६ जानेवारी रोजी सकाळी उमरगा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम सुरू होता. झेंडावंदन सुरू असताना पीएसआय मोहन जाधव यांना अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले.
झेडपी निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील जागावाटप व एबी फॉर्म वाटपाच्या मुद्द्यावरून धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेत तीव्र असंतोष उफाळून आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात भ्रष्टाचाराने अक्षरशः कळस गाठला असून, संबंधित शासकीय अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने सार्वजनिक निधीवर राजरोस दरोडा टाकला जात असल्याचे चित्र समोर आले आहे.
निवडणूकीच्या अनुषंगाने धाराशिव तालुक्यात नामनिर्देशन पत्रे छाननीअंती ज्या तीन नामनिर्देशन पत्रावर आक्षेप आले होते, त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुनावणी घेण्यात आली.
२४ जानेवारी ते १० मार्चपर्यंत सहायक स्तरावर पीकपाहणी करता येईल. यासाठी संबंधित सहायकाची माहिती व संपर्क क्रमांक त्या गावचे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून उपलब्ध होतील, असे आवाहन करण्यात आले.
राज्यातल्या बारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी निवडणूक होत आहे. यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.