भूम शहरातील भीमनगर परिसरात बौद्ध समाज व पवित्र बौद्ध विहारावर कथित हल्ला झाल्याच्या निषेधार्थ आरपीआय (खरात)च्या वतीने जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
Dharashiv Crime: जिल्ह्यातील बेंबळी परिसरातील कनगरा येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या या घटनेनंतर बुधवारी सकाळी प्रकार उघडकीस आला.
धाराशिव जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिका सेवेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, ही सेवा अक्षरशः ‘व्हेंटिलेटर’वर गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
Dharashiv Crime News : कळंब पोलीस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल 36 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलीस अंमलदाराला रंगेहात पकडण्यात आले.
आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी उमरगा येथे भीम पॅंथर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत शासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवला आणि ‘जोडे मारो’ आंदोलनाद्वारे संताप व्यक्त केला.
धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे पेट्रोल पंपासमोर झालेल्या भीषण अपघात झाला. BLO चे शासकीय काम पूर्ण करून दुचाकीवरून घरी परतत असताना भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
४०० केव्ही हाय व्होल्टेज लाईन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यल्प मोबदल्यात घेतल्या जात असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. काही शेतकऱ्यांना हजारो रुपयांत गप्प केले जात असल्याचे समोर आलं आहे.
धाराशिव जिल्ह्यातील वडगाव येथील हृषिकेश शिंदे या विद्यार्थ्याच्या आयुष्यात ‘मीना राजू मंच’ उपक्रमामुळे मोठा सकारात्मक बदल घडला आहे. घरकामातून लिंगसमतेचा संदेश दिला.
धाराशिव जिल्ह्यातील सारोळा गावात आयोजित बालसभेत इयत्ता आठवीतील शिवकन्या खरे हिने लोकशाही प्रक्रियेवरील आपला ठाम विश्वास व्यक्त केला. नागरिक म्हणून आपले हक्क आणि जबाबदाऱ्या अधोरेखित केल्या.
धाराशिवच्या वाखरवाडीत लिंग समभावाची मशाल खांद्यावर घेऊन चालणारे दीपक शिंदे! स्वतःचे शिक्षण अर्धवट राहिल्यानंतरही त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली.
२२ ते २५ एप्रिल दरम्यान धाराशिव जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून संभाव्य अवकाळी पाऊस व वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या संपामुळे धाराशिव जिल्ह्यातील शासकीय कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला असून अनेक कामे ठप्प झाली आहेत. नागरिकांना विविध सेवांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
धाराशिव तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वीज कोसळल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात जमिनीच्या वादातून काकानेच पुतण्याची चाकूने हत्या केली. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या सुजित शेळकेवर संतापाच्या भरात वार करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला.
परंडा येथे तहसीलदारांची गाडी अडवून शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
धाराशिव येथील माविमला राज्यात दुसरा क्रमांक मिळाला असून, बचतगटांच्या बळावर महिलांनी उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या यशामुळे महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळाली आहे.
Dharashiv News Marathi : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बेकायदेशीरपणे सुरू असलेले महाकाली कला केंद्र तात्काळ बंद करण्यात आले. नियमभंग आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाने ही कारवाई केली.
धाराशिवमध्ये भाडे मागितल्याच्या वादातून भाडेकरूने घरमालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात घरमालक गंभीर जखमी होऊन 26 टाके पडले. आरोपीला अटक करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
धाराशिव येथे दलित तरुणाच्या संशयास्पद मृत्यूमुळे संतापाची लाट उसळली आहे. Ambedkar Jayantiच्या पार्श्वभूमीवर परिसरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना क्र. २ अंतिम टप्प्यात असून, भूसंपादनातील अडथळे दूर करून कामांना गती देण्यात आली आहे. १०,८६२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.