
Dharashiv News: धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक! कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन
Dharashiv News: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या धाराशिव जिल्हा आढावा बैठकीत संघटन अधिक मजबूत करण्यावर, कार्यकर्त्यांना व्यापक संधी देण्यावर आणि आगामी निवडणुकांसाठी सज्ज होण्यावर विशेष भर देण्यात आला. जिल्ह्यात पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन पक्ष निरीक्षक रवींद्र पाटील यांनी केले. पाटील यांनी पक्षवाढीसाठी प्रत्येक तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जाणार आहे. तळागाळापर्यंत पोहोचून संघटनात्मक बांधणी मजबूत करणे अत्यावश्यक असून, पक्षातील ३५ विविध सेलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Tuljapur News: तुळजापूरमध्ये अवैध धंदे वाढले; नगराध्यक्षांचा पोलिसांना इशारा
धाराशिव जिल्हा हा शरद पवार यांच्या विचारसरणीशी जोडलेला असून, त्या विचारांना मानणारा वर्ग पुन्हा सक्रिय करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेणे ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले. सूत्रसंचालन अॅड. अमोल पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. तुषार वाघमारे यांनी मांडले.
बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. भूम तालुकाध्यक्षपदी बालाजी गटकळ, जिल्हा चिटणीसपदी आर्यन शिंदे, युवक विभागाच्या जिल्हा सरचिटणीसपदी गणेश खराडे, कळंब तालुका युवक अध्यक्षपदी भीमा हगारे तसेच सामाजिक न्याय विभागाच्या कळंब तालुका कार्याध्यक्षपदी अशोक थोरात यांची निवड करण्यात आली. खचून न जाता नव्या उमेदीने कामाला लागा. महिला जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील यांनी कठीण काळात पक्ष टिकवून ठेवण्याचा अनुभव सांगितला, तर युवक नेते पृथ्वीराज आंधळे यांनी युवकांना अधिक संधी देण्याची मागणी केली.
Dharashiv News: जनहिताच्या डीपीसी निधीतून सामाजिक न्यायाला हरताळ : उच्चस्तरीय चौकशीची मागणी
जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. शाम घोगरे यांनी कठीण परिस्थितीतही पंचायत समितीत यश मिळवल्याचे सांगितले, तर शहराध्यक्ष आयाज शेख यांनी नागरिकांचा विश्वास कायम राखण्याचे आवाहन करताना पराभव व विजय हे लोकशाही प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगत, कार्यकर्त्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने कामाला लागावे, असे आवाहन केले. प्रारंभी दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अपेक्षित पाठबळ मिळत नसल्याची खंत आहे. राज्यस्तरीय नेतृत्वाकडून अपेक्षित पाठबळ मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. युवक नेते रणवीर इंगळे यांनी प्रथम पक्ष आणि नंतर महाविकास आघाडी अशी भूमिका असावी, असे मत मांडले.