Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माढा मतदारसंघात दुष्काळ सदृश्य परिस्थिती ;  पुढील आठवड्यात टँकर सुरू करावे लागणार

पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले तरी माढा तालुक्यात सरासरी २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, उजनी धरण परिसरात  अवर्षणग्रस्त परिस्थिती असून धरणात सध्या १४.४६ टक्के पाणी व ७.६५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा तयार झाला आहे.

  • By Aparna
Updated On: Aug 30, 2023 | 07:09 PM
Water shortage in Maharashtra

Water shortage in Maharashtra

Follow Us
Close
Follow Us:
टेंभुर्णी : माढा विधानसभा मतदारसंघात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे, गावोगावी पाण्याचे टँकर ,जनावरासाठी चारा- छावण्या व मजुरांना काम द्यावे लागेल. तुळशी येथे पाण्याचा टँकर सुरू करण्यात येत असून पुढील आठवड्यात माढा, मोडनिंब व परिसरातील वाड्या रस्त्यावर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागतील, अशी काळजी युक्त परिस्थिती निर्माण झालेली आहे तसेच पशुधन जगवण्यासाठी गावोगावी चारा छावण्या  काढण्याची वेळ आलेली आहे , त्यामुळे शासनाने जनतेला सर्वतोपरी मदत व सहकार्य करावे असे प्रतिपादन आमदार बबनराव शिंदे यांनी केले आहे.
आमदार बबनराव शिंदे म्हणाले की, पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले तरी माढा तालुक्यात सरासरी २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, उजनी धरण परिसरात  अवर्षणग्रस्त परिस्थिती असून धरणात सध्या १४.४६ टक्के पाणी व ७.६५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा तयार झाला आहे. उजनी धरणाच्या डावा-उजवा कालवा, भीमासीना जोड कालवा (बोगदा-सीना नदीकाठ) सीना-माढा व दहिगाव सिंचन योजना या लाभक्षेत्रातील लाखो एकर ऊस, फळबागा, चारा वैरण, व खरिपाची उभी पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. उजनी धरणाच्या उपयुक्त साठ्यातून कालवा बोगदा व दोन्ही सिंचन योजनेद्वारे एक आवर्तन सोडले तर या उभ्या जळून चाललेल्या पिकांना पुन्हा जीवदान मिळणार आहे, परंतु यास शासन व प्रशासनाने नकार दिला आहे. सध्या उजनीच्या वरील तीन धरणातून काही नविसर्गाने पाणी खाली येत आहे.

 पशुधन जगवण्यासाठी धडपड
कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार हे दिसून येत आहे. शेतकरी आपले पशुधन जगवण्यासाठी पाण्याअभावी जळून चाललेली ऊस व इतर काही पिके तोडून जनावरांना खाऊ घालू लागले आहेत. सर्वत्र विहिरी, बोरवेल, ओढे नाले कोरडे पडल्यामुळे पिण्यासाठी पाणी मिळण्याची अवस्था दिवसेंदिवस कठीण बनू लागली आहे.

उजनी जलाशयात ४६२५ क्युसेक विसर्ग
उजनी जलाशयात फक्त ४६२५ क्युसेक विसर्गाने पाणी येत आहे, परंतु हा विसर्ग देखील पूर्णपणे भरवशाचा नाही. यामुळे सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती दिसून येत आहे. यासाठी शासनाने मागेल त्या गावी पाण्याचा टँकर, जनावरासाठी चारा छावण्या व मजुरांसाठी कामे देण्याची मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी केली आहे.

Web Title: Drought like situation in madha constituency nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2023 | 07:09 PM

Topics:  

  • Madha
  • maharashtra
  • Solapur News
  • Tembhurni

संबंधित बातम्या

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
1

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी
2

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
3

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
4

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.