Water shortage in Maharashtra
पशुधन जगवण्यासाठी धडपड
कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार हे दिसून येत आहे. शेतकरी आपले पशुधन जगवण्यासाठी पाण्याअभावी जळून चाललेली ऊस व इतर काही पिके तोडून जनावरांना खाऊ घालू लागले आहेत. सर्वत्र विहिरी, बोरवेल, ओढे नाले कोरडे पडल्यामुळे पिण्यासाठी पाणी मिळण्याची अवस्था दिवसेंदिवस कठीण बनू लागली आहे.
उजनी जलाशयात ४६२५ क्युसेक विसर्ग
उजनी जलाशयात फक्त ४६२५ क्युसेक विसर्गाने पाणी येत आहे, परंतु हा विसर्ग देखील पूर्णपणे भरवशाचा नाही. यामुळे सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती दिसून येत आहे. यासाठी शासनाने मागेल त्या गावी पाण्याचा टँकर, जनावरासाठी चारा छावण्या व मजुरांसाठी कामे देण्याची मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी केली आहे.