Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Election Commission 2025: निवडणुकीत मतदारांची नावे वगळल्याचा काँग्रेसचा आरोप; निवडणूक आयोगाने दिले उत्तर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर मतदार यादीतून नावे वगळल्याचा आरोप केला होता. निवडणुकीनंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी आयोगावर निशाणा साधला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 24, 2024 | 05:09 PM
Election Commission 2025: निवडणुकीत मतदारांची नावे वगळल्याचा काँग्रेसचा आरोप; निवडणूक आयोगाने दिले उत्तर
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आणि निकालावरून  गेल्या काही दिवसांपासून काँग्रेससह राज्यभरातील विरोधी पक्षांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इतकेच नव्हे तर, केंद्रीय निवडणूक आयोगालाही लक्ष्य केलं जात आहे. अशातच, या सर्व प्रकरणात आता केंद्रीय निवडणूक आयोगानेही  काँग्रेसला उत्तर दिले आहे.  महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभा जागेसाठी पक्षाने मागवलेला डेटा आणि फॉर्म 20 महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, तो डाउनलोड करून पाहू शकता, असंं आयोगाने म्हटलं आहे.

मतदार यादीतून मतदारांची नावे वगळण्याबाबत

महाराष्ट्र निवडणुकीच्या मतदार यादीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना केंद्रीय निवडणूक आयोगाने सविस्तर उत्तरे दिली. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, काँग्रेसने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत 80 हजार 391 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती. म्हणजे एका विधानसभेतून सरासरी 2779 मतदार काढून टाकण्यात आले.

Ramtek Bungalow History: रामटेक बंगला शुभ की अशुभ? भुजबळांपासून खडसेंपर्यंत काय आहे कहाणी

संपूर्ण प्रक्रियेचे पालन  – निवडणूक आयोग

यावर निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, जी नावे हटवण्यात आली आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण प्रक्रियेचे पालन करण्यात आले आहे. नोटीस जारी करण्याबरोबरच, अशा प्रकरणांमध्ये मतदाराचा मृत्यू झाला आहे, किंवा त्याचा पत्ता बदलला आहे, किंवा तो आता त्या पत्त्यावर राहत नाही, याची खात्री करण्यासाठी क्षेत्र सर्वेक्षण करण्यात आले, त्यानंतरच मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात आली.

काँग्रेसला दिलेल्या उत्तरात निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान राजकीय पक्ष किंवा उमेदवारांच्या सक्रिय सहभागाची सुमारे 60  उदाहरणे दिली. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, राजकीय पक्ष/उमेदवारांचा अर्थपूर्ण सहभाग हा भारतीय निवडणूक प्रक्रियेचा प्रमुख आधारस्तंभ आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील तक्रारींबाबत काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी निवडणूक आयोगाकडे अनेक आकडे मागितल्याचे सांगितले होते.

Pro Kabaddi League 11 : अखेरच्या सामन्यात पुणेरी पलटणचा शानदार विजय

नाना पटोलेंचा आरोप

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर मतदार यादीतून नावे वगळल्याचा आरोप केला होता. निवडणुकीनंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी आयोगावर निशाणा साधला होता.नाना पटोले यांनी बुलढाणा जिल्ह्यातील  चिखली तालुक्यातील  तेल्हारा गावातील सरपंचाचा व्हिडीओ दाखवत  या गावातील मतदारयादीतील 60 नावे वगळण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.   नाना पटोले यांनी दाखवलेल्या व्हिडीओत  तेल्हारा गावाच्या सरपंच किरण गाडेकर यांचा एक व्हिडिओ दाखवत गावातील मतदार याद्यांमधून मतदारांची  नावेच वगळण्यात येत असल्याचा गंभीर  केला. या  किरण गाडेकर यांनी त्यांच्यासह गावातील ६० मतदारांचे नाव यादीतून वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला.  भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दाबवतंत्राचा वापर केला जता आहे. फॉर्म 7 मार्फत‌ आमचे मतदार कमी करण्याचा प्रयत्न आहे.  याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे आजच तक्रार करणार, असल्याचेही नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Election commissions response to congresss allegation of omission of voters names in elections nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 05:09 PM

Topics:  

  • Congress
  • election commission of india
  • Maharashtra Political News
  • Nana patole

संबंधित बातम्या

कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचा चर्चेत राहण्याचा विचित्र प्रयत्न; पक्षाला डोकेदुखी ठरणारे वादग्रस्त वक्तव्य
1

कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचा चर्चेत राहण्याचा विचित्र प्रयत्न; पक्षाला डोकेदुखी ठरणारे वादग्रस्त वक्तव्य

Chiplun News: आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज! चिपळूणमध्ये २७ फेब्रुवारीपासून ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर
2

Chiplun News: आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज! चिपळूणमध्ये २७ फेब्रुवारीपासून ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर

पुण्यातील राजकीय हिंसाचाराच्या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक; शिष्टमंडळाची पोलिस आयुक्तांसोबत चर्चा
3

पुण्यातील राजकीय हिंसाचाराच्या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक; शिष्टमंडळाची पोलिस आयुक्तांसोबत चर्चा

शर्ट काढून काँग्रेसचे विचित्र आंदोलन; भारत मंडमपमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन
4

शर्ट काढून काँग्रेसचे विचित्र आंदोलन; भारत मंडमपमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.