Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१२ तास उलटून गेले तरी शवविच्छेदन नाही हा तर रुक्मीणीबाई रुग्णालयाचा बेजबाबदारपणाच…

डोंबिवली परिसरातील आडवली परिसरातील अब्दुल उर्फ वाजीद सय्यद या व्यक्तीची त्याच्या मित्रांनी हत्या केली. मानपाडा पाेलिसांनी आरोपीला ताब्यात घेत वाजीदचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 25, 2024 | 10:45 AM
१२ तास उलटून गेले तरी शवविच्छेदन नाही हा तर रुक्मीणीबाई रुग्णालयाचा बेजबाबदारपणाच…
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : एका व्यक्तीची हत्या झाल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केडीएमसीच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला. १२ तास उलटून गेले तरी त्याच्या मृतदेहाचे शववि्च्छेदन करण्यात आले नाही. मृतकाच्या कुटुंबियांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदन करायचा नव्हता. तर आम्हाला याची कल्पना आधी का दिली नाही. आत्ता मृतदेह जे. जे. रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ आली आहे. तर रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे की, आमच्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट नसल्याने आम्ही शवविच्छेदन करुन शकत नाही. या प्रकरणात फॉरेन्सिक एक्सपर्टची गरज का आहे. त्या व्यक्तिला धारदार शस्त्राने मारण्यात आले आहे. या घटनेतून रुग्णालय प्रशासनाचा बेजबाबदारपणा दिसून येत आहे.

डोंबिवली परिसरातील आडवली परिसरातील अब्दुल उर्फ वाजीद सय्यद या व्यक्तीची त्याच्या मित्रांनी हत्या केली. मानपाडा पाेलिसांनी आरोपीला ताब्यात घेत वाजीदचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला. रात्री शवविच्छेदन झाले नाही. सकाळीही झाले नाही. दुपारपर्यंत नातेवाईक ताटकळत होते. नातेवाईकांनी जेव्हा रुग्णालयात विचारले की, शवविच्छेदन का केले जात नाही. इतका उशिर का होत आहे. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्यांच्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि एमडी डॉक्टर नसल्याने शवविच्छेदन होऊ शकत नाही असे सांगितले. पोलिसांनाही हेच सांगण्यात आले. अखेर १२ तासानंतर मृतदेह जे जे रु्णालयात घेऊन जाण्याची वेळ मृतकाच्या नातेवाईकांवर आली आहे. कुटुंबीयाचे म्हणणे आहे की, रुग्णालयात एमडी डॉक्टर आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट नव्हता. तसेच एमडी डॉक्टर उपलब्ध नाही. तर आम्हाला याची आधीच कल्पना का दिली गेली नाही. आम्हाला १२ तास ताटकळत का ठेवले. मृतदेह पंख्याखाली उघडा ठेवला आहे हा बेजबाबदारपणा आहे.

या प्रकरणी डॉक्टर पराग पाडवी यांचे म्हणणे आहे की, आमच्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट नाही. हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. अशा प्रकरणात फॉरेन्सिक एक्सपर्ट लागतो. त्यामुळे शवविच्छेदन झाले नाही. त्याचबरोबर आजपर्यंत डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णलायत शवविच्छेदन कक्ष सुरु झालेला नाही. लोकांचे अजूनही हाल होत आहेत. खरे पाहता या प्रकरणात फॉरेन्सिक एक्सपर्टची गरज नाही. आरोपी सापडला आहे हत्यारही सापडले आहे. केवळ टाळाटाळ करण्यासाठी रुग्णालयाकडून शवविच्छेदन केले जात नाही. हा रुग्णलयाचा बेजबाबदारपणा आहे हेच यातून उघड झाले आहे.

Web Title: Even after 12 hours there is no postmortem but the irresponsibility of rukminibai hospital kalyan crime case thane crime maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2024 | 10:45 AM

Topics:  

  • kalyan
  • kalyan crime case
  • KDMC hospital
  • Maharashtra Government
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Kalyan Connectivity: नवी मुंबई–कल्याण प्रवास लवकरच सुलभ; ऐरोली–कटाई उन्नत मार्ग अंतिम टप्प्यात
1

Navi Mumbai Kalyan Connectivity: नवी मुंबई–कल्याण प्रवास लवकरच सुलभ; ऐरोली–कटाई उन्नत मार्ग अंतिम टप्प्यात

Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी
2

Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी

शासनविरोधातील आंदोलन शिक्षकांना भोवले? तब्बल 25 लाख शिक्षकांचे पगारच रोखले
3

शासनविरोधातील आंदोलन शिक्षकांना भोवले? तब्बल 25 लाख शिक्षकांचे पगारच रोखले

Vasai Crime: जामिनासाठी खर्च केलेल्या पैशांवरून बहिणीवर गोळीबार; घरातून जिवंत हँड ग्रेनेड व गावठी रिव्हॉल्व्हर जप्त
4

Vasai Crime: जामिनासाठी खर्च केलेल्या पैशांवरून बहिणीवर गोळीबार; घरातून जिवंत हँड ग्रेनेड व गावठी रिव्हॉल्व्हर जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.