Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हमीभाव नुसताच नावाला; खर्चही निघणे कठीण, शेतमालाला योग्य भावही मिळेना

सोयाबीनचा पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च काढला, तर 25 हजार रुपये एकरपर्यंत येतो आणि संपूर्ण सोयाबीन शेतकऱ्यांनी विकला, तर 30 हजार रुपये त्यांच्या हातात येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 23, 2024 | 10:26 AM
मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; पावसाअभावी पिके आली संकटात

मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; पावसाअभावी पिके आली संकटात

Follow Us
Close
Follow Us:

भिवापूर : शेतकऱ्यांचे कापूस आणि सोयाबीन हे प्रमुख खरीप हंगामातील पीक आहे. याच पिकावर संपूर्ण शेतकऱ्यांचे बजेट असते. सोयाबीन पिकाची मळणी सुरू आहे. सोयाबीन बाजारात नेल्यानंतर योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चदेखील भरून निघत नाही. त्यामुळे अल्प पैशांमध्ये शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी कशी करावी, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

मागील 2023 च्या वर्षांमध्ये सोयाबीन पिकावर येलो मोजॅक व अतिवृष्टीमुळे हातचे पीक वाहून गेले होते. पण यावर्षी गतवर्षीपेक्षा सोयाबीन पीक बऱ्यापैकी आले. किमान उत्पादन खर्च निघून मुलांना कपडे, फटाके घेऊन दिवाळी साजरी करण्याच्या आशा शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर होत्या. पण बाजारात सोयाबीन विक्रीस नेल्यानंतर शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा सोयाबीनचे दर कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील भरून निघत नाही आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील शेती कशी करायची, हा पेच शेतकऱ्यांसमोर आहे.

सोयाबीन पिकाला हमीभाव 4892 असून सुद्धा हमीभावाने सोयाबीन खरेदी केली जात नाही. चार हजार पासून ते चार हजार 500 रुपयापर्यंत बाजारपेठेत सोयाबीन खरेदी केल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळेल असे शेतकऱ्यांना वाटले होते. परंतु भाव काही केल्या मिळत नाही.

एकरी 25 हजारांचा खर्च

सोयाबीनचा पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च काढला, तर 25 हजार रुपये एकरपर्यंत येतो आणि संपूर्ण सोयाबीन शेतकऱ्यांनी विकला, तर 30 हजार रुपये त्यांच्या हातात येत आहे. मग या उरलेल्या पाच हजार रुपयांमध्ये दिवाळी साजरी कशी करायची आणि रब्बी हंगामाला बी बियाणे, खते कुठून घ्यायचे, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

दिवाळीच्या अगोदरच सोयाबीन कापणीला वेग

दिवाळी सणाच्या अगोदरच सोयाबीन कापणीला वेग आला आहे. हमीभावही शेतकऱ्यांना परवडेना : सरकारने शेतकऱ्यांच्या पदरामध्ये सोयाबीनचा भाव पाडण्यासाठी हमीभाव 4892 रुपये जाहीर केला, परंतु शेतकऱ्यांनी सोन्यासारखी पिकवलेले सोयाबीन मातीमोल भावाने बाजारात विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्चदेखील शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. किमान सोयाबीनला सहा हजार रुपये भाव सरकारने द्यावा, तरच शेतकऱ्यांना सोयाबीनचे पीक परवडेल.

Web Title: Farmer not getting good price on crop production nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 10:26 AM

Topics:  

  • Farming News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News  : नागपूरात परवानगीविना चालवल्या अल्पसंख्यांक शाळांवर गुन्हा दाखल
1

Nagpur News : नागपूरात परवानगीविना चालवल्या अल्पसंख्यांक शाळांवर गुन्हा दाखल

Business Ideas : आता नोकरीचं टेन्शन सोडा… घर बसल्या सुरु करा ‘हा’ व्यवसाय, कमी गुंतवणुकीत शानदार कमाई
2

Business Ideas : आता नोकरीचं टेन्शन सोडा… घर बसल्या सुरु करा ‘हा’ व्यवसाय, कमी गुंतवणुकीत शानदार कमाई

Nagpur : चंद्रशेखर बावनकुळे यांचे नागपुरात वक्तव्य, राजकीय घडामोडींवर भाष्य
3

Nagpur : चंद्रशेखर बावनकुळे यांचे नागपुरात वक्तव्य, राजकीय घडामोडींवर भाष्य

Nagpur News : फुटपाथरील अतिक्रमणे हटवणार अन् रस्ते वाहतूक कोंडीमुक्त होणार; नागपूरसाठी नितीन गडकरींचा खास प्लॅन
4

Nagpur News : फुटपाथरील अतिक्रमणे हटवणार अन् रस्ते वाहतूक कोंडीमुक्त होणार; नागपूरसाठी नितीन गडकरींचा खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.