Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांवर पुन्हा संकट; मजुराचा जाणवतोय मोठा तुटवडा, कांदा काढणीत येणार अडचण

नवीन काढून झालेल्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने तसेच आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने हा कांदा आखाती देशात पाठवता येत नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 24, 2026 | 03:01 PM
शेतकऱ्यांवर पुन्हा संकट; मजुराचा जाणवतोय मोठा तुटवडा

शेतकऱ्यांवर पुन्हा संकट; मजुराचा जाणवतोय मोठा तुटवडा

Follow Us
Close
Follow Us:

पारगाव शिंगवे : आंबेगाव तालुक्यात पहिल्या टप्प्यातील कांदा पिकांच्या काढणीला सुरुवात झाली आहे. कांदा काढण्यासाठी शेतकऱ्यांना मजुराचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर अवकाळी पाऊस सावट आणि बाजारभाव समाधानकारक मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्याच्या पूर्व भागात पहिल्या टप्प्यातील कांदा काढण्यासाठी शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठी धावपळ करावी लागत आहे. तसेच अवकाळी पावसाचे सावट असून, काही दिवसांपूर्वी काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. शेतातील कांदा काढणीसाठी बीड जिल्ह्यातील मजूर उपलब्ध होत असून, साखर कारखान्याचे गळीत हंगाम संपले आहे. ऊसतोड मजुरांना आपल्या गावाकडे रोजगार मिळत नसल्याने गावाकडे न जाता कारखाना परिसरात मुक्कामी असून, तालुक्यात या मजुरांना शेतात कांदा काढणी व अन्य शेतीची कामे मिळत आहेत. या मजुरांना बागायती क्षेत्रात रोजगार मिळत आहे.

तीन महिन्यानंतर हे मजूर आपल्या गावाकडे जाणार आहेत. तसेच कांदा काढणी जुन्नर तालुक्यातील मावळेही उपलब्ध होत आहेत. परंतु, गावोगावी सर्वत्र कांदा काढणी सुरु असल्याने कांदा काढणीसाठी मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. बागायती परिसर असल्याने व ऊसाचे क्षेत्र असल्याने या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे शेतात कांदा काढणीसाठी महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नवीन काढून झालेल्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने तसेच आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने हा कांदा आखाती देशात पाठवता येत नाही. या कांद्याला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच अनेक शेतकरी कांदा काढून हा कांदा चार-पाच -सहा दिवस शेतात मुरून देऊन मग तो कांदा बराखीत साठवण्यात येतो. भविष्यात चांगला बाजारभाव मिळेल या आशेवर कांदा बराकीत साठवण्यात येतो, असे शेतकरी माऊली ढोबळे यांनी सांगितले.

यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी ठरतोय चिंतेचा

दुसरीकडे, जुन्नर तालुक्यातील ओतूर, रोहोकडी आणि लगतच्या परिसरात सध्या उन्हाळी कांदा काढणीच्या कामांनी वेग घेतला आहे. मात्र, यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी आनंदाचा ठरण्याऐवजी चिंतेचा ठरत आहे. एकीकडे हवामानातील बदलांशी झुंज देत कष्टाने पिकवलेला कांदा हातात आला असताना, दुसरीकडे परप्रांतीय मजुरांच्या तुटवड्यामुळे आणि स्थानिक मजुरांच्या वाढत्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

हेदेखील वाचा : शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ ! उन्हाळीस ९४९ रुपये, तर लाल कांद्याच्या बाजारभावात ५०० रुपयांची घसरण

Web Title: Farmers face another crisis severe labor shortage felt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • Farmer Issue
  • Farmers Issue

संबंधित बातम्या

Breaking News: Devendra Fadnavis यांची साताऱ्यात मोठी घोषणा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा
1

Breaking News: Devendra Fadnavis यांची साताऱ्यात मोठी घोषणा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

सरोवर बंदमुळे खरिपाच्या बियाणे योजनेत अडकले शेतकरी; मुदतवाढीची आता मागणी सुरु
2

सरोवर बंदमुळे खरिपाच्या बियाणे योजनेत अडकले शेतकरी; मुदतवाढीची आता मागणी सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.