Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जत तालुक्यातील शेतकरी आक्रमक! अतिवृष्टीमुळे भाताचे ९०% पीक खराब, एकरी ५० हजाराच्या मदतीची मागणी

कर्जत तालुक्यात सततच्या पावसामुळे भाताचे ९०% पीक खराब झाले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन तातडीने एकरी ५०,००० रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. प्रशासनाकडून सरसकट पंचनामे करण्याचे आश्वासन.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 27, 2025 | 07:29 PM
कर्जत तालुक्यातील शेतकरी आक्रमक!

कर्जत तालुक्यातील शेतकरी आक्रमक!

Follow Us
Close
Follow Us:
  • भाताचे पीक पाण्यात भिजले
  • तहसीलदारांनी सरसकट पंचनामे करण्याचे आश्वासन दिले
  • उद्यापासून पंचनामे सुरू होणार
कर्जत: कर्जत तालुक्यात भाताचे जवळपास ९० टक्के पीक हे सततच्या पावसामुळे पूर्णपणे खराब झाले आहे. शेतकऱ्यांचे पीक शेतात साचलेल्या पाण्यात भिजत असल्याने झालेले मोठे नुकसान लक्षात घेऊन शेतकरी कर्जत तहसील कार्यालयात आक्रमक झाले होते. संतप्त शेतकऱ्यांनी शासनाकडे ५० हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी तालुक्यातील शेती पिकाच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी मान्य केली आहे. उद्यापासून (२६ ऑक्टोबर) तालुक्यात सरसकट पंचनामे केले जातील, असे आश्वासन डॉ. जाधव यांनी दिले आहे.

६००० हेक्टरवरील पीक धोक्यात

गेले महिनाभर सुरू असलेल्या पावसामुळे कर्जत तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भाताचे पीक शेतातच कोसळले असून, कापून ठेवलेले भाताचे पीक पाण्यात भिजत असल्याने शेतकरी पूर्णपणे संकटात सापडला आहे. यावर्षी भाताचे एकूण क्षेत्र साधारण ६००० हेक्टर होते, त्यापैकी ५३०० हेक्टर जमिनीचे नुकसान सततच्या पावसामुळे झाले आहे.

शेतकऱ्यांनी आक्रमकपणे आपली बाजू मांडली

या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आज तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांची भेट घेण्यासाठी गर्दी केली होती. त्यावेळी तहसीलदार यांचे न्यायालयीन कामकाज सुरू असल्याने शेतकऱ्यांना काही काळ कार्यालयाबाहेर ताटकळत थांबावे लागले. त्यानंतर, न्यायालयाचे कामकाज थांबवून तहसीलदारांनी शेतकऱ्यांना कार्यालयात बोलावून घेतले. यावेळी काही शेतकऱ्यांनी आक्रमकपणे आपली बाजू मांडली आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे सरकार कधी बघणार, अशी खंत व्यक्त केली.

Matheran News : दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांची माथेरानला पसंती; मात्र ‘या’ कारणासाठी येणारे पर्यटक नाराज

शेतकरी संघटनेचे निवेदन

त्यानंतर शेतकरी संघटनेच्या वतीने ज्येष्ठ शेतकरी चंद्रकांत मांडे, बाळू थोरवे, मनोहर पिंगळे, बजरंग श्रीखंडे, वैशाली ठाकरे, अशोक थोरवे, सुरेश ठोंबरे, सुदाम हाबळे, तसेच उत्तम, विश्वनाथ घारे, अंकुश शेळके, मयूर पाटील, महादू निकामी, मधुकर जाधव, रामचंद्र राऊत, चंद्रकांत भुसारी, तुकाराम थोरवे, पदमाकर मोकाशी, राजेश ठाकरे, राजाराम बार्शी, नरेश भोईर, उदय चव्हाण, पंढरीनाथ तळपे, विलास भगत, भास्कर मुने, रवींद्र मांडे, नामदेव मोदक आदी शेतकऱ्यांनी निवेदन दिले.

निवेदनातील प्रमुख मागण्या

१. नुकसानग्रस्त भातपीक शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांचे अनुदान (नुकसान भरपाई) देण्यात यावे.

२. शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन भाताच्या शेतीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत.

यावेळी तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी उद्या कृषी अधिकारी, कृषी सहायक आणि तलाठी यांची बैठक बोलावली असून, तालुक्यात ५२६५ शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत, मात्र उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने केले जातील, असे आश्वासन दिले.

Karjat News : कर माफीच्या अभय योजनेत मुदतवाढ करा ; शिवसेनेकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Web Title: Farmers in karjat taluka are aggressive 90 of the rice crop has been damaged due to heavy rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 07:29 PM

Topics:  

  • farmer
  • Karjat
  • raigad
  • rain

संबंधित बातम्या

Raigad News: अलिबाग तालुक्यात निवडणूक रणसंग्राम! कुठे तिरंगी, कुठे चौरंगी लढत; राजकीय गणितं बदलणार
1

Raigad News: अलिबाग तालुक्यात निवडणूक रणसंग्राम! कुठे तिरंगी, कुठे चौरंगी लढत; राजकीय गणितं बदलणार

Cabinet Meeting Decision Today : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचे 4 सर्वात मोठे निर्णय!
2

Cabinet Meeting Decision Today : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचे 4 सर्वात मोठे निर्णय!

Raigad News: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! शेकाप-शिंदे गट मोट बांधण्याच्या चर्चा, युतीबाबत संभ्रम कायम
3

Raigad News: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! शेकाप-शिंदे गट मोट बांधण्याच्या चर्चा, युतीबाबत संभ्रम कायम

Panvel Municipal Corporation: राष्ट्रवादीचा गड कोसळला; पनवेल महापालिकेत फुलले कमळ आणि धनुष्यबाण
4

Panvel Municipal Corporation: राष्ट्रवादीचा गड कोसळला; पनवेल महापालिकेत फुलले कमळ आणि धनुष्यबाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.