Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation : मराठा समाजाचे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता; मनोज जरांगेंनी सरकारला दिला ‘हा’ इशारा

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला चारपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. असे असताना सरकारकडून मागण्यांचा विचार केला गेला नाहीतर पाच कोटी मराठा बांधव मुंबईत धडकणार असल्याचा इशाराच त्यांनी यावेळी दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 02, 2025 | 09:19 AM
Maratha Reservation : मराठा समाजाचे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता; मनोज जरांगेंनी सरकारला दिला 'हा' इशारा

Maratha Reservation : मराठा समाजाचे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता; मनोज जरांगेंनी सरकारला दिला 'हा' इशारा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून वेळोवेळी उपोषण-आंदोलन केले जात आहे. त्यानंतर आता त्यांनी मुंबईत उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला चारपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. असे असताना सरकारकडून मागण्यांचा विचार केला गेला नाहीतर पाच कोटी मराठा बांधव मुंबईत धडकणार असल्याचा इशाराच त्यांनी यावेळी दिला.

मराठा समाजाचे लोक मुंबईत आले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, अशी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी ते आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. सरकारच्या हातून अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारनं तात्काळ मागण्या पूर्ण कराव्यात. अन्यथा अजून 5 कोटी मराठे मुंबईत धडकणार असल्याचे जरांगेंनी सांगितले. सरसकट आरक्षणावर कोर्टाच्या निर्णयांचा पेच आहे. त्यामुळे सरकारची हैदराबाद आणि सातारा गॅझेटवर चर्चा सुरू असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. नेहमीप्रमाणे मराठा आरक्षणावरून जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. तर, सामाजिक काम करताना तुम्हाला शिव्या आणि टीका सहन करावी लागते असं प्रत्युत्तर टीकाकारांवर फडणवीसांनी दिले.

…तोपर्यंत मुंबई सोडणार नाही

ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांची आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. तर जरांगेंच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीनंतर ओबीसी नेत्यांनी देखील बैठकींचा सपाटा लावत जरांगेंच्या मागणींचा विरोध केला.

आझाद मैदान तातडीने खाली करा; पोलिसांची नोटीस

दरम्यान, या आंदोलनादरम्यानच मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगेंना नोटीस देण्यात आली. आझाद मैदान तातडीने खाली करा, अशी नोटीस मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना दिली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून जरांगेंना नोटीस पाठवण्यात आली आहे. आंदोलनाला आता मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे.

नियमानुसार आंदोलन व्हावे

मनोज जरांगेंच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीच विधान केले आहे. त्यांनी ‘लोकशाहीत कोणालाही आपले मत मांडण्याचा व मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलनासाठी जे नियम व निकष देण्यात आले आहेत. त्या नियमानुसार हे आंदोलन झाले, तर आम्हाला काही अडचण नाही. मुंबई उच्च न्यायालयानेही निकष ठरविले आहेत. त्यामुळे आता सरकारच्या ते हाती नाही’, असे म्हटले होते.

Web Title: Five crore more marathas will protest in mumbai manoj jarange warns to government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 09:19 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Manoj Jarange
  • Maratha Arakshan
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर
1

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण
2

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही
3

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही

Ahilyanagar News: अतिवृष्टी होऊन गेली सुद्धा मात्र शेतकरी मदतीपासून वंचितच! चिंचोडी शिराळ परिसरातील बळीराजा नाराज
4

Ahilyanagar News: अतिवृष्टी होऊन गेली सुद्धा मात्र शेतकरी मदतीपासून वंचितच! चिंचोडी शिराळ परिसरातील बळीराजा नाराज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.