Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: ठाणे महापालिकेतील भरतीत स्थानिकांना ५० टक्के प्राधान्य द्यावे, माजी गटनेते नारायण पवार यांची मागणी

ठाणे महापालिकेच्या भरतीत स्थानिकांना निदान ५० टक्के तरी प्राधान्य द्या, अशी मागणी माजी गटनेते नारायण पवार यांनी केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 11, 2025 | 09:42 PM
ठाणे महापालिकेतील भरतीत स्थानिकांना ५० टक्के प्राधान्य द्यावे, माजी गटनेते नारायण पवार यांची मागणी

ठाणे महापालिकेतील भरतीत स्थानिकांना ५० टक्के प्राधान्य द्यावे, माजी गटनेते नारायण पवार यांची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे महापालिकेतील गट ‘क’ व गट ‘ड’ श्रेणीतील पदांवरील भरतीत महापालिका क्षेत्रातील ५० टक्के बेरोजगार तरुण-तरुणींना प्राधान्य देण्याची मागणी भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. ही मागणी २० जुलै २०१७ रोजी झालेल्या महासभेतील ठरावाच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आली आहे.

या भरतीसाठी २ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून, एकूण १,७७३ पदांसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. यापूर्वी २०१७ मध्ये वाहनचालक, इलेक्ट्रिक चेकर, पाणी खात्यातील विविध पदांसाठी भरती झाली होती. त्या वेळी ठाणे महापालिका क्षेत्रातील एकाही स्थानिक बेरोजगाराची निवड झाली नव्हती. भरती प्रक्रियेत पदाच्या स्वरूपाशी संबंध नसलेले प्रश्न विचारले गेल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यावेळी नारायण पवार यांनी हा मुद्दा महासभेत मांडला होता, ज्याला शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन मिळाले होते. त्यानंतर महासभेत स्थानिक उमेदवारांना ५०% प्राधान्य देण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. तत्कालीन सभागृह नेते व विद्यमान खासदार नरेश म्हस्के यांनीही या ठरावाला अनुमोदन दिले होते.

Nitesh Rane: “राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी…”; मंत्री नितेश राणेंचे निर्देश

नारायण पवार यांनी यंदाच्या भरतीत २०१७ चा ठराव अंमलात आणण्याचा आग्रह धरला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या भरतीसाठी मोठ्या संख्येने स्थानिक बेरोजगार अर्ज करणार असून, त्यांना संधी मिळाली पाहिजे.

परीक्षा शुल्क कपातीची मागणी

या भरतीसाठी अमागास प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क १,००० रुपये तर मागास व अनाथ प्रवर्गासाठी ९०० रुपये ठेवण्यात आले आहे. पवार यांनी हे शुल्क बेरोजगारांसाठी अन्यायकारक असल्याचे सांगत, अमागास प्रवर्गासाठी शुल्क ५०० आणि मागास व अनाथ प्रवर्गासाठी ३०० करण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सामान्य कुटुंबातील बेरोजगार तरुण-तरुणींसाठी विद्यमान शुल्क रक्कम अवास्तव आहे आणि त्यात कपात करणे गरजेचे आहे.

नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी शौचालयांची ३० वर्षांची करार पद्धत रद्द करा, मंगलप्रभात लोढा यांच्या सूचना

८ वर्षांपूर्वीची भरती, ठाणेकर बेरोजगारांची उपेक्षा

२०१७ मध्ये ठाणे महापालिकेतील विविध पदांसाठी झालेल्या भरतीत एकाही स्थानिक उमेदवाराची निवड झाली नव्हती. त्यामुळे ठाण्यातील बेरोजगारांची उपेक्षा झाल्याची भावना निर्माण झाली होती. त्या वेळी पात्र असलेले अनेक उमेदवार आता वयोमर्यादा ओलांडल्यामुळे पुन्हा अर्ज करू शकत नाहीत. त्यामुळे यंदाच्या भरतीत स्थानिकांना न्याय मिळावा, अशी ठाम मागणी होत आहे.

Web Title: Former group leader narayan pawar demands 50 percent priority for locals in thane municipal corporation recruitment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 09:42 PM

Topics:  

  • Thane Municipal Corporation
  • Thane news
  • TMC

संबंधित बातम्या

Water Pipeline Burst : लाखो लीटर पाणी वाया! ठेकेदाराचा हलगर्जीपणा आणि पालिकेडून नागरिकांची फसवणूक, ठाण्यात चाललंय तरी काय?
1

Water Pipeline Burst : लाखो लीटर पाणी वाया! ठेकेदाराचा हलगर्जीपणा आणि पालिकेडून नागरिकांची फसवणूक, ठाण्यात चाललंय तरी काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.