
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना १ हेक्टर जमीन, १ लाखांचे अनुदानही मिळणार, काय आहे नवी योजना? (फोटो सौजन्य-ChatGPT)
जन्म-मृत्यू नोंदणीचा केंद्रीय सर्व्हर ठप्प! जिल्ह्यात दाखला वितरण खोळंबले; पूर्वसूचना नसल्याने फरफट
या योजनेअंतर्गत महिलांना पाच वर्षांसाठी जमीन वापरासाठी दिली जाणार आहे. या जमिनीवर चारा लागवड, नेपियर गवत, बांबू शेती तसेच ग्रासलँड डेव्हलपमेंटसारखे उपक्रम राबवता येणार आहेत. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती वाढवणे आणि महिलांचे उत्पन्न वाढवणे हा सरकारचा उद्देश आहे. याशिवाय, बचत गटांना व्यवसाय सुरू करण्यासाठी १ लाख रुपयांचे अनुदान देखील देण्यात येणार आहे. या आर्थिक मदतीमुळे महिलांना सुरुवातीच्या गुंतवणुकीसाठी आधार मिळेल आणि व्यवसाय उभारणी सोपी होईल.
तसेच अडीच एकर जमिनीवर चारा किंवा बांबूची योग्य प्रकारे लागवड केल्यास, महिला बचत गटांना वार्षिक ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळू शकते, असा दावा सरकारने केला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या जमिनीतून मिळणाऱ्या संपूर्ण नफ्यावर आणि उत्पन्नावर केवळ संबंधित महिला बचत गटाचाच अधिकार असेल; त्यावर सरकार कोणताही दावा करणार नाही. मात्र ही जमीन महिला बचत गटांना कायमची दिली जाणार नाही. पाच वर्षांच्या लीजवर दिली जाणार आहे.
या योजनेतून मिळणारे उत्पन्न थेट संबंधित महिला बचत गटालाच मिळणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महिलांना नियमित आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल आणि त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल.
राज्यातील अनेक महिला बचत गट विविध व्यवसायांमध्ये कार्यरत आहेत. मात्र, जागेची कमतरता आणि आर्थिक मर्यादांमुळे अनेक उपक्रमांना गती मिळत नाही. शासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती वाढण्यास मदत होईल. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांना याचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे. महिलांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर उद्योजकतेच्या दिशेने सक्षम करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असून, ही योजना त्यातील एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.