Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन वर्षात सरकारच्या आश्वासनांचे फुगे फुटणार, नवीन वर्षातील नव्या नियमावलीवरुन सामनातून केंद्र सरकारवर टीका

सरत्या वर्षाला निरोप देताना सरकारने सोडलेले आश्वासनांचे फुगे फुटण्याची आणि 2023 मध्ये तरी जुन्या प्रश्नांची गाठोडी हलकी होतील, या जनतेच्या अपेक्षेवर पाणी फेरण्याची ही सुरुवात आहे. पुढे आणखी काय होते ते वर्षभरात दिसेलच. मात्र नव्या युगाच्या बाता करणाऱ्यांच्या राज्यातही वर्ष बदलले, प्रश्न कायम हे चित्र नवीन वर्षातही बदललेले नाही.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 02, 2023 | 07:32 AM
नवीन वर्षात सरकारच्या आश्वासनांचे फुगे फुटणार, नवीन वर्षातील नव्या नियमावलीवरुन सामनातून केंद्र सरकारवर टीका
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई- 2022 या वर्षाला निरोप देत, आपण 2023 या नवीन वर्षाचे स्वागत केले, मात्र या नवीन वर्षात नियमांचे बदल केल्यामुळं याचा फटका सर्वसामान्यांना बसणार याचे सरकारला काय देणे घेण नाही, यावरुन सामनातून केंद्र सरकारवर टिका करण्यात आली आहे. नव्या वर्षाच्या सूर्योदयालाच केंद्र सरकारने विविध क्षेत्रांतील नवे नियम आणि बदलांचा दणका देत सर्वसामान्यांच्या बजेटला ‘दे धक्का’ दिला आहे. नवीन वर्षात जनतेच्या समस्या कमी करण्याचे मोदी सरकारचे वादे आणि दावे फोल ठरण्याची, सरत्या वर्षाला निरोप देताना सरकारने सोडलेले आश्वासनांचे फुगे फुटण्याची आणि 2023 मध्ये तरी जुन्या प्रश्नांची गाठोडी हलकी होतील, या जनतेच्या अपेक्षेवर पाणी फेरण्याची ही सुरुवात आहे. पुढे आणखी काय होते ते वर्षभरात दिसेलच. मात्र नव्या युगाच्या बाता करणाऱ्यांच्या राज्यातही वर्ष बदलले, प्रश्न कायम हे चित्र नवीन वर्षातही बदललेले नाही. अशी टिका सामनातून केंद्र सरकारवर करण्यात आली आहे.

दरम्यान, जरी आपण नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले असले तरी नवीन वर्षात मूळ प्रश्न तेच आहेत. नवीन वर्षात सरकारच्या काही नियमातील बदलामुळं सामान्य माणसाला भुर्दड सोसावा लागणार आहे, विमा, वाहन, बँका, टपाल खाते आदीमुळं सामान्य लोकांचे नुकसान होणार आहे. आधीच 2022 या वर्षात महागाई, बेरोजगार, इंधानाचे सतत वाढणारे भाव यामुळं सामान्य माणूस आधीच कंटाळलेला आहे, या महागाईच्या गर्दीत सापडलेला असताना, आता नवीन नियमावली लादून केंद्र सरकारने लोकांचे जगणे मुश्किल करुन ठेवले आहे, अशी टिका सामनातून केंद्र सरकारवर करण्यात आली आहे.

अपेक्षांची नवी नवलाई संपणार आहे, बँका, विमा, वाहन खरेदी, टपाल, पॅन कार्ड लिंक या नवीन वर्षातल नियमांमुळं सरकार काय साध्य करणार आहे, कर्जाचे हफ्त्यामध्ये वाढ होणार आहे, मोदी सरकारच्या काळात जीडीपी घसरला आहे, महागाईनं डोके वर काढले आहे. तसेच अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना, आता मोदी सरकारनं नवीन नियमावली जारी करत, सामान्य लोकांचे जगणं मुश्किल केल आहे. अशी टिका सामनातून केंद्र सरकारवर करण्यात आली आहे.

Web Title: Government promises will burst in the new year criticism of the central government from the saamana on the new rules in the new year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2023 | 07:32 AM

Topics:  

  • BJP
  • sanjay raut
  • shivsena
  • Udhav Thackeray

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.