Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् ज्ञानेश कुमारांचे, मतचोरीमुळे एनडीएचा विजय; हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रीया

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सर्व श्रेय निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचे आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 14, 2025 | 06:19 PM
बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् ज्ञानेश कुमारांचे, मतचोरीमुळे एनडीएचा विजय; हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रीया

बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् ज्ञानेश कुमारांचे, मतचोरीमुळे एनडीएचा विजय; हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रीया

Follow Us
Close
Follow Us:
  • बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोगाचे
  • मतचोरीमुळे एनडीएचा विजय
  • हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रीया

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सर्व श्रेय निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचे आहे. मतचोरी, बोगस मतदान आणि SIR च्या माध्यमातून विरोधकांचे मतदार वगळण्याने भाजपा व मित्रपक्षाचा विजय झाला आहे, असे म्हणत बचेंगे तो और भी लढेंगे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांचा पदग्रहण सोहळा टिळक भवन येथे पार पडला. या सोहळ्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष डॉ. अनिल जयहिंद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव जितेंद्र बघेल, सहप्रभारी बी. एम. संदीप, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सचिन नाईक, राजेंद्र राख, सरचिटणीस दादासाहेब मुंडे, रामहरी रुपनवर, शाह आलम शेख, पल्लवी रेणके आदी उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर प्रसार माध्य़मांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, बिहारच्या निकालानंतर सत्ताधारी जे आरोप करत आहेत त्यात काहीही सत्य नाही ते निराधार आहेत. पाच वर्ष गरिब जनतेकडे दुर्लक्ष करून निवडणुकीच्या तोंडावर महिलांना दिलेले १० हजार रुपये याचाही परिणाम झाला का, यावर चर्चा होईल. पण ज्या पद्धतीने निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला निवडून आणण्यासाठी काम करत आहे हे पाहता हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. देशाला आता टी. एन. शेषन सारख्या निवडणूक आयुक्तांची गरज आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

ज्येष्ठ नेते, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, ओबीसी समाजातील छोट्या छोट्या जातीकडे लक्ष देण्याची गरज आहे, त्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचले पाहिजे. लहान घटकांना एकत्र करून संघटनेची ताकद वाढवा. काँग्रेस व राज्यघटनेचा विचार एकच आहे, हा विचार समतेचा आहे आणि आपल्या संत महंतानी जे सांगतिले तेच राज्य घटनेत आहे. देश सध्या एका संकटातून जात असून, जो लढतो त्याचा इतिहास लिहिला जातो. आज राहुल गांधी देश, लोकशाही व राज्यघटना वाचवण्याची लढाई लढत आहेत या लढाईत सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन थोरात यांनी केले.

Web Title: Harshvardhan sapkal has reacted after the bihar election results

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 06:19 PM

Topics:  

  • Bihar Election
  • BJP
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

ठाण्यात भाजपला मोठा धक्का; रवींद्र चव्हाणांच्या कार्यपद्धतीला कंटाळून 5 नगरसेवकांनी उचलले मोठे पाऊल
1

ठाण्यात भाजपला मोठा धक्का; रवींद्र चव्हाणांच्या कार्यपद्धतीला कंटाळून 5 नगरसेवकांनी उचलले मोठे पाऊल

Bihar Election Result 2025 Live: बिहारमध्ये महागठबंधनचा ‘या’ कारणांमुळे सुपडासाफ; केवळ 28…
2

Bihar Election Result 2025 Live: बिहारमध्ये महागठबंधनचा ‘या’ कारणांमुळे सुपडासाफ; केवळ 28…

Bihar Election Result 2025 : बिहार निवडणुकीत NDA 190 ने आघाडीवर; तर रितेश पांडे, तेजप्रताप, तेजस्वी आणि खेसारी लाल यादव पिछाडीवर
3

Bihar Election Result 2025 : बिहार निवडणुकीत NDA 190 ने आघाडीवर; तर रितेश पांडे, तेजप्रताप, तेजस्वी आणि खेसारी लाल यादव पिछाडीवर

Bihar Election Result 2025 : निवडणूक आयोगाच्या वेबसाइटमध्ये तांत्रिक बिघाड, आघाडीवरील उमेदवार ‘पराभूत’ म्हणून घोषित!
4

Bihar Election Result 2025 : निवडणूक आयोगाच्या वेबसाइटमध्ये तांत्रिक बिघाड, आघाडीवरील उमेदवार ‘पराभूत’ म्हणून घोषित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.