Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: उच्च न्यायालयाचा आदेश, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा नाही; निधी वर्ग करण्यात विलंब का होतोय ?

धाराशिव जिल्ह्यातील खरीप २०२० पिकविमा प्रकरणात बॉम्बे उच्च न्यायालय (छत्रपती संभाजीनगर खंडपीठ) यांनी २४ नोव्हेंबर रोजी निकाल देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे २३४ कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 22, 2026 | 09:00 PM
Dharashiv News: उच्च न्यायालयाचा आदेश, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा नाही; निधी वर्ग करण्यात विलंब का होतोय? (photo-social media)

Dharashiv News: उच्च न्यायालयाचा आदेश, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा नाही; निधी वर्ग करण्यात विलंब का होतोय? (photo-social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • उमरग्याच्या शेतकऱ्यांमध्ये १३४ कोटींच्या निधीवरून मोठा संभ्रम
  • न्यायालयाचा आदेश; तरीही बळीराजाला मदत मिळेना
  • निधी वर्ग करण्यात विलंब का होतोय ?
 

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील खरीप २०२० पिकविमा प्रकरणात बॉम्बे उच्च न्यायालय (छत्रपती संभाजीनगर खंडपीठ) यांनी २४ नोव्हेंबर रोजी निकाल देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे २३४ कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते. यासाठी २४ जानेवारीपर्यंत दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र शासनाकडून निर्धारित कालावधीत रक्कम वितरित करण्यात आली नाही. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, उच्च न्यायालयात जमा असलेले ७५ कोटी रुपये व त्यावरील व्याजासह सुमारे ९४ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले. तथापि, योग्य खाते उपलब्ध नसल्याचे कारण देत ही रक्कमही शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली नाही. याच काळात पिकविमा कंपनीने सर्वोच्च न्यायालय येथे धाव घेत ९४ कोटी रुपयांवर स्थगिती आदेश मिळविला. शासन निर्णय झाला; निधी मात्र अद्याप प्रलंबितपिकविमा कंपनीचा १३४ कोटी रुपयांचा हप्ता राज्य शासनाकडे देय होता.

Latur Zilla Parishad: चाकूरमध्ये राजकीय भूकंप! २६ उमेदवारांची डिपॉझिट जप्त

तो निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करावा, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय जाहीर झाला. मात्र अद्याप ही रक्कम जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेली नाही. २३ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर १३४ कोटी रुपयांवर कोणताही तोंडी किंवा लेखी स्थगिती आदेश नसतानाही निधी वर्ग करण्यात विलंब का होत आहे, असा सवाल अनिल जगताप यांनी उपस्थित केला. ही रक्कम वेळेत प्राप्त झाली असती तर शेतकऱ्यांना तत्काळ वाटप करता आले असते, असे त्यांनी म्हटले आहे.

या संदर्भात अनिल जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून १३४ कोटी रुपये तातडीने जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करून शेतकऱ्यांना वितरित करावेत, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून अर्ज संबंधित खात्याकडे पाठविण्यात आल्याचा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद विजयाचा जल्लोष; दिलीपराव देशमुखांच्या हस्ते सत्कार

उच्च न्यायालयाचा निकाल लागूनही दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला, तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात रक्कम मिळालेली नाही. २३ फेब्रुवारीच्या सुनावणीत स्थगिती मिळाल्यास आधीचे ९४ कोटी व सध्याचे १३४ कोटी रुपये न्यायालयीन प्रक्रियेत अडकून पडतील, अशी भीती व्यक्त करत अनिल जगताप यांनी शासनावर टीका केली. २०२० चा विमा मिळण्यासाठी २०२६ उजाडावे लागले, तरीही प्रतीक्षा संपत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Web Title: High court order still no money in farmers accounts why is there a delay in transferring funds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • Dharashiv

संबंधित बातम्या

४० वर्षे उलटली, तरी मोबदला नाही! उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दणका; प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे दिले कठोर आदेश!
1

४० वर्षे उलटली, तरी मोबदला नाही! उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दणका; प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे दिले कठोर आदेश!

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! धाराशिव तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेसंदर्भात कारवाई सुरू
2

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! धाराशिव तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेसंदर्भात कारवाई सुरू

मजकूर हटवण्याचे आदेश, मॅजिस्ट्रेटला अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम
3

मजकूर हटवण्याचे आदेश, मॅजिस्ट्रेटला अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम

Dharashiv News : धाराशिवच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निकृष्ट कामांचा धडाका, गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
4

Dharashiv News : धाराशिवच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निकृष्ट कामांचा धडाका, गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.