Photo Credit- Team navrashtra कशी होती फडणवीस आणि अटल बिहार वाजपेयींची पहिली भेट
नागपूर: दिल्लीत झालेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, हे जवळपास निश्चित झाले आहे. या संदर्भात फक्त अधिकृत घोषणाच बाकी राहिली आहे,असेही सांगितले जात आहे. साहजिकच महाराष्ट्रात भाजपच्या आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी कामगिरीमागे देवेंद्र फडणवीस यांचे योगदान मानले जात आहे. 2014 मध्ये भाजपने राज्यात 122 जागा जिंकल्या तेव्हा विजयाचे श्रेय त्यांच्या कौशल्याला दिले गेले. 2019 मध्येही भाजपला 105 जागा आणि यावेळी 132 जागा जिंकण्यात त्यांची सर्वात मोठी भूमिका मानली जात आहे. त्यामुळे यावेळी भाजपकडून त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राजकारणाचा वारसा मिळाला. त्यांचे वडील गंगाधरराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्यही होते. 54 वर्षीय देवेंद्र 17 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मात्र, वडिलांमुळेच ते शालेय जीवनापासूनच राजकारणात आले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी प्रथम नागपुरातील भाजप संघटनेत प्रभाग निमंत्रक म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि 1992 मध्ये नागपूर महापालिका निवडणुकीत विजयी होऊन ते नगरसेवक झाले. वयाच्या 27 व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेचे महापौर बनून विक्रम केला. त्यावेळी ते देशातील सर्वात तरुण महापौर होते. 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले.
७ दिवसांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली नाही तर..; काय सांगतात नियम
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार , ही घटना 2006 मध्ये घडली होती. नागपूर शहरातील अनेक चौकात कपड्याच्या दुकानाची जाहिरात करणारे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. त्यात एका मॉडेलचे छायाचित्र होते. ते मॉडेल दुसरे कोणी नसून देवेंद्र फडणवीस होते. तोपर्यंत ते सात वर्षे आमदार होते. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून तिच्या मॉडेलिंगची बातमी दिल्लीत अटलजींपर्यंत पोहोचली होती. अशाच एका प्रसंगी ते दिल्लीत अटलजींना भेटायला आले असता , ‘या, मॉडेल आमदारसाहेब या. अशा शब्दांत हसतमुखाने त्यांचे स्वागतही केले होते.
असाच एक किस्सा म्हणजे आणीबाणीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांना अटक झाली. त्यावेळी ते ज्या इंदिरा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत होते. त्या शाळेतून त्यांनी स्वत:चे नावही काढून घेतले होते. तत्त्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावल्यामुळे आणि त्यांच्या शाळेचे नाव इंदिरा कॉन्व्हेंट स्कूल असल्यामुळेच त्यांनी शाळेतून नाव काढून घेतले होते.
‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेची संशयावरून हत्या; खंबाटकी घाटात फेकला
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम केला आहे. 2005 मध्ये गायिका आणि बँकर अमृता रानडे यांच्याशी लग्न केले. त्यांच्या मुलीचे नाव दिविजा आहे.