Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra HSC 12th Result: बारावीच्या परीक्षेत राज्यात ४५ टक्के विद्यार्थी ६० टक्क्यांच्या आत

परीक्षा देताना काही हरकती घेतलेल्या, काही समस्या असलेल्या अथवा अन्य कारणास्तव आक्षेप घेणा-या १४७ विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 05, 2025 | 04:03 PM
अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ ठप्प

अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ ठप्प

Follow Us
Close
Follow Us:

पुणे, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४४.५१ टक्के विद्यार्थ्यांना ४५ ते ६० टक्क्यांच्या आतच गुण मिळाले आहेत. तर केवळ ०.६ टक्के विद्यार्थी ९० टक्क्यांच्या पुढे असून, ४५ टक्क्यांच्या आत म्हणजे काठावर पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी १३.३९ इतकी आहे.

शिक्षण मंडळाकडील आकडेवारीनुसार, ६ लाख २ हजार २२७ विद्यार्थ्यांनी ४५ ते ६० टक्क्यांच्या आत गुण मिळविले आहेत. ९० टक्क्यांच्या पुढे गुण मिळविणारे ८ हजार ३५२, ८५ ते ९० टक्के गुण मिळविणारे २२ हजार ३१७, ८० ते ८५ टक्के गुण मिळविणारे ४६ हजार ३३६, ७५ ते ८० टक्के गुण मिळविणारे ७४ हजार १७२, ७० ते ७५ टक्के गुण मिळविणारे १ लाख ३ हजार ७०, ६५ ते ७० टक्के गुण मिळविणारे १ लाख ३१ हजार ८१२, ६० ते ६५ टक्के गुण मिळविणारे १ लाख ८१ हजार ७५५ विद्यार्थी आहेत. बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या १३ लाख ४८ हजार ५८८ इतकी आहे.

Maharashtra HSC 12th Result: शिक्षण मंडळाची मोठी घोषणा: राज्यातील १२४ परीक्षा केंद्रांची मान्यता होणार रद्द

२० हजार ९४३ खेळाडू विद्यार्थ्यांना मिळाले सवलतीचे गुण

खेळाडू, एन.सी.सी. व स्काऊट गाईड असलेल्या राज्यातील २० हजार ९४३ खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळाले आहेत. राज्यात अशा प्रकारे गुण मिळविणारे सर्वाधिक विद्यार्थी हे मुंबई विभागात असून ही संख्या ४ हजार ७७१ इतकी आहे. तर सर्वात कमी सवलतीचे गुण प्राप्त करणारे विद्यार्थी हे कोकण विभागात असून, ही संख्या १ हजार १९१ इतकी आहे.

१८ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

राज्यातील ९ विभागातील परीक्षा केंद्रांवर १८ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा दिली असून, हे सर्व विद्यार्थ्री उत्तीर्ण झाले आहेत.

Bandra मध्ये आता घेऊ शकता घर, कितीची SIP देईल तुम्हाला नफा; किती वेळ लागेल जाणून घ्या एका क्लिकवर

१४७ विद्यार्थ्यांचा निकाल ठेवला राखून

परीक्षा देताना काही हरकती घेतलेल्या, काही समस्या असलेल्या अथवा अन्य कारणास्तव आक्षेप घेणा-या १४७ विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक राखून ठेवलेला निकाल हा नागपूर विभागातील असून, आक्षेप घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या ही १३७ इतकी आहे. या सर्व विद्यार्थ्यांना मंडळाकडून सुनावणीसाठी बोलवून घेण्यात येणार असून, त्यावेळी त्यांची बाजू समजून घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. दरम्यान राज्यात परीक्षा काळात एकूण् १३० विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास बंदी घालण्यात आली.

Web Title: In the 12th examination 45 percent students in the state scored within 60 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • Board Exams
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध
1

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Top Marathi News Today: नववर्षाच्या स्वागताला मुंबईत पावसाच्या सरी, पश्चिम उपनगरात मध्यम सरीने मुंबईकरांची तारांबळ
2

Top Marathi News Today: नववर्षाच्या स्वागताला मुंबईत पावसाच्या सरी, पश्चिम उपनगरात मध्यम सरीने मुंबईकरांची तारांबळ

Explainer: BMC Elections मध्ये कोणता पक्ष कोणासह? कोणाच्या विरोधात, नव्या राजकारणाने डोक्याचा होईल भुगा
3

Explainer: BMC Elections मध्ये कोणता पक्ष कोणासह? कोणाच्या विरोधात, नव्या राजकारणाने डोक्याचा होईल भुगा

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince
4

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.