Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

अनेक ठिकाणी तलाव, विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. ग्रामीण भागात टँकरची मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आत्ताच दिसत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 04, 2026 | 01:08 PM
मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यासह पुणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना उन्हाचा तीव्र चटका बसू लागला आहे. नेहमी एप्रिल-मे महिन्यात जाणवणारी उष्णतेची तीव्रता यंदा मार्चमध्येच जाणवत आहे. त्यामुळे शेती, पशुधन, पाणीपुरवठा आणि आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

अचानक वाढलेल्या तापमानामुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला यांसारख्या रब्बी पिकांवर ताण येत आहे. पिकांची वाढ खुंटणे, दाणे भरण्याची प्रक्रिया अपूर्ण राहणे, त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. फुलगळ व पानगळ वाढणे, उष्णतेमुळे जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत असून, शेतकऱ्यांना पिकांना अतिरिक्त पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे वीज वापर आणि इतर खर्च वाढत आहे. उन्हामुळे कुरणातील गवत लवकर वाळत आहे. हिरवा चारा कमी उपलब्ध होत असल्याने पशुपालकांना सुक्या चाऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन घटणे, जनावरांमध्ये अशक्तपणा, उष्माघाताचा धोका ही होण्याची शक्यता जाणकारांमधून व्यक्त होत आहे.

दरम्यान, अनेक ठिकाणी तलाव, विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. ग्रामीण भागात टँकरची मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आत्ताच दिसत असून, पाण्यासाठी नागरिकांची धावपळ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शेतीसाठी पाणी सिंचनावर देखील मर्यादा पडण्याची शक्यता आहे.

नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे उष्माघात, डिहायड्रेशन, डोकेदुखी, त्वचारोग, रक्तदाबातील चढउतार यांसारख्या तक्रारी वाढू शकतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्रमिक वर्ग यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे ठरणार आहे. त्यासाठी दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे, भरपूर पाणी व द्रवपदार्थ घ्यावेत, डोक्यावर टोपी/रुमाल वापरावा, जनावरांना सावली व स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे.

प्रशासनाकडून अपेक्षित उपाययोजना

सुरु असलेल्या कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे योग्य ते नियोजन,प्रसंगी जनावरांसाठी चारा छावण्यांची तयारी, आरोग्य शिबिरे, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व मदत मिळणे गरजेचे असेल. मार्चच्या सुरुवातीलाच वाढलेली उष्णता ही आगामी एप्रिल-मे महिन्यात अधिक तीव्र होण्याची शक्यता दर्शवत आहे. त्यामुळे प्रशासन, शेतकरी आणि नागरिकांनी आतापासूनच दक्षता घेणे आवश्यक ठरत आहे.

हेदेखील वाचा : Samruddhi Expressway: समृद्धी महामार्गावर शिवडे येथे इंटरचेंज, एमएसआरडीसी-सार्वजनिक बांधकाम विभागाची चाचपणी

Web Title: Intense heatwave in early march serious impact on agricultural crops and animal fodder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • Climate Change
  • summer heat
  • Weather Update

संबंधित बातम्या

लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी; शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृत्यू
1

लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी; शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृत्यू

राज्यात उष्णतेचे मोडत आहेत रेकॉर्ड्स; 11 जिल्ह्यांत पाणी टंचाईचे सावट कायम
2

राज्यात उष्णतेचे मोडत आहेत रेकॉर्ड्स; 11 जिल्ह्यांत पाणी टंचाईचे सावट कायम

कडाक्याच्या उन्हामुळे घसा सतत कोरडा पडतो? ‘या’ सायलेंट किलर आजारांची लागण झाल्यानंतर दिसतात गंभीर लक्षणे
3

कडाक्याच्या उन्हामुळे घसा सतत कोरडा पडतो? ‘या’ सायलेंट किलर आजारांची लागण झाल्यानंतर दिसतात गंभीर लक्षणे

Rain Alert ! मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
4

Rain Alert ! मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.