
Jalgaon banana exports suspended due to Iran-Israel war causing losses to farmers and traders
जळगाव जिल्हा हा केळीच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. केळीच्या पदार्थांचे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. त्याचबरोबर परदेशांमध्ये देखील जळगावच्या दर्जेदार केळींची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. रमजान महिन्यामध्ये ही मागणी अधिक वाढते. मात्र रमजान महिन्यामध्येच आखाती देशांमध्ये युद्ध स्थिती निर्माण झाली आहे. तसेच सुप्रीम नेते अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या झाल्यामुळे रमजान सणावर शोककळा पसरली आहे. यामुळे मुस्लिम वर्गातील रमजानाचा उत्साह पूर्णपणे निघून गेला आहे. याचा फटका जळगावमधील शेतकऱ्यांना बसला आहे.
हे देखील वाचा : पुण्यातील इंदिरा विद्यालयाचे 84 जण दुबईमध्ये अडकले; भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु
जळगाव जिल्ह्यातून सध्या देखील दररोज सुमारे 12 कंटेनर केळी आखाती देशांकडे पाठवली जात होती. मात्र युद्ध परिस्थितीमुळे ही निर्यात पूर्णपणे ठप्प पडली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. . एकीकडे केळीची निर्यात ठप्प झाली असून दुसरीकडे केळीच्या दरात देखील मोठी घट झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. युद्धापूर्वी केळीचा दर 2500 रुपये क्विंटल एवढा होता. मात्र, त्यात आता घट झाल्याने केवळ 1500 रुपये क्विंटल एवढाच दर केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची मदत करावी असे आवाहन केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून केले जात आहे.
हे देखील वाचा : मध्यपूर्वेतील युद्ध आता निर्णायक वळणावर! इराणचा थेट नेतन्याहूंच्या कार्यालयावरच हल्ला, IRGC चा दावा
पुण्यातील विद्यार्थी अडकले दुबईत
पुण्यातील इंदिरा या नामांकित विद्यालयाचे ८४ लोक दुबईमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. ८४ जणांमध्ये ८० विद्यार्थी असून ४ शिक्षकांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून या सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृपया कोणी ही घाबरून जाऊ नये, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशात आणले जाणार आहे असे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच सर्व विद्यार्थी हे सुरक्षित असल्याची खात्री विद्यापीठाने दिली आहे.
कोल्हापूरमधील पर्यटकांची चिंता वाढली
आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दीडशे नागरिक विविध ठिकाणी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आखाती देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 150 कोल्हापूरकरांपैकी 130 जणांची अधिकृत माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली आहे. या सर्व नागरिकांशी प्रशासन सातत्याने संपर्कात असून ते सुरक्षित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.