इरान इस्त्राइल युद्धावेळी दुबईमध्ये पुणे पीसीएमसी इंदिरा विद्यापीठाचे 84 जण दुबईमध्ये अडकले (फोटो - सोशल मीडिया)
Pune students stuck in Dubai : पुणे : मध्यपूर्वमध्ये इराण-इस्त्रायल युद्धाची ठिणगी पडली आहे. याचा आता भडका उडाला असून यामधून विनाशकारी युद्धाला सुरुवात झाली आहे. इराण-इस्रायल युद्धामध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांची हत्या करण्यात आली आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, दुबईमध्ये पिंपरी चिंचवड भागातील इंदिरा या नामांकित विद्यापीठाचे 84 जण दुबईमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना सुखरुप भारतामध्ये आणण्याचे पूर्ण प्रयत्न सुरु आहेत.
पुण्यातील इंदिरा या नामांकित विद्यालयाचे ८४ लोक दुबईमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. ८४ जणांमध्ये ८० विद्यार्थी असून ४ शिक्षकांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून या सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृपया कोणी ही घाबरून जाऊ नये, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशात आणले जाणार आहे असे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच सर्व विद्यार्थी हे सुरक्षित असल्याची खात्री विद्यापीठाने दिली आहे.
हे देखील वाचा : World War 3: Israel-Iran युद्धाचा ‘रिमोट कंट्रोल’ भारताच्या हातात? S. Jaishankar यांच्या ‘एका’ फोनने तेल अवीव ते तेहरानपर्यंत खळबळ
पुण्यातील हे विद्यार्थी “स्टडी व्हिसिट” साठी दुबई येथे गेले होते. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा पुण्यामध्ये आणण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय प्रयत्न करत आहे. महाविद्यालयाचे डीन जनार्दन पवार, यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, सगळे विद्यार्थी सुखरूप आणि सुरक्षित आहेत. 42 मुलं आणि 42 मुली असा 84 जणांचा विद्यार्थ्यांचा समूह दुबई येथे गेला होता. आम्ही या विद्यार्थ्यांच्या पालकांशी आणि दुबईमध्ये असलेल्या सगळ्या शिक्षकांशी सुद्धा संपर्कात आहोत. विद्यार्थ्यांना आणि पालकांना घाबरून न जाण्याचा आवाहन आहे. परराष्ट्र मंत्रालय तसेच भारतीय दूतावासासोबत महाविद्यालयाशी बोलणी सुरू आहे.
हे देखील वाचा : Iran Israel वादाचे भारतात पडसाद; खामेनेईच्या मृत्यूनंतर शेकडो शिया मुस्लीम रस्त्यावर, श्रीनगरमध्ये जोरदार निदर्शने
Iran Israel वादाचे भारतात पडसाद
इराणचे सुप्रीम नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यामुळे इराण आक्रमक भूमिका घेतली आहे. या युद्धाचे पडसाद भारतामध्ये देखील पडू लागले आहे. अमेरिका-इस्रायली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच काश्मीर खोऱ्यातील लोक रस्त्यावर उतरले. अमेरिका-इस्रायली ऑपरेशन “ऑपरेशन एपिक फ्युरी” हे येथील अनेक लोक इस्लाम आणि विशेषतः शिया मुस्लिम समुदायावरील हल्ला मानतात. या ऑपरेशनमध्ये ४० हून अधिक इराणी नेत्यांचा मृत्यू झाला, ज्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला. भारतामध्ये देखील शेकडो निदर्शक खामेनींचे मोठे फोटो आणि पोस्टर्स घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांनी सतत “खामेनी चिरंजीव होवो” आणि “अमेरिका आणि इस्रायल मुर्दावाद” अशा घोषणा दिल्या, ज्या त्यांच्या तीव्र संताप आणि विरोधाचे प्रतिक आहे. काश्मीरमध्ये या हल्ल्याचा तीव्र विरोध करण्यात आला आहे. तसेच हा हल्ला भ्याड असल्याचे देखील म्हटले आहे.






