Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Violence : ‘पूर्व नियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होतात का?’; जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी गृहमंत्रालयाला चांगलेच सुनावले. 'दंगल जर पूर्व नियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होतात का?', अशा शब्दांत त्यांनी सरकारला धारेवर धरलं.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 25, 2025 | 07:57 AM
'पूर्व नियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होतात का?'; जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर

'पूर्व नियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होतात का?'; जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मोठी दंगल उसळली होती. त्यानंतर हिंसाचारही झाला होता. या दंगलीच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी गृहमंत्रालयाला चांगलेच सुनावले. ‘दंगल जर पूर्व नियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होतात का?’, अशा शब्दांत त्यांनी सरकारला धारेवर धरलं. पोलिस खाते काय करत होते? पूर्व नियोजित कट जर आधी पकडता आला, तर ते पोलिस खाते, असेही त्यांनी म्हटले आहे.

अंतिम आठवडा प्रस्तावावर माजी मंत्री जयंत पाटील बोलत होते. गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात झालेल्या दंगलींची आकडेवारी जयंत पाटलांनी सभागृहात सांगितली. 2024 मध्ये देशात सर्वाधिक दंगली महाराष्ट्रात घडल्या आहेत, असे सांगत त्यांनी चिंता व्यक्त केली. नागपूर दंगलीवर पाटील म्हणाले, ‘पोलिस खातं काय करत होते? पूर्व नियोजित कट जर आधी पकडता आला, तर ते पोलिस खाते. म्हणजे आपणच कबूल करतोय. अचानक झालेली दंगल आपण समजू शकतो. पूर्वनियोजित कट झाला आणि दंगल झाली. नागपूरसारख्या शहरामध्ये दंगल होणं म्हणजे…’

तसेच सगळ्यात शांत प्रवृत्तीची लोक त्या नागपूरमध्ये राहतात. तिथे दंगल घडवून आणली म्हणजे दंगल घडवून दाखवणाऱ्याचे कौतुक आहे, असा उपरोधिक टोलाच त्यांनी गृहमंत्रालय आणि सरकारला लगावला.

दंगली का होतात?

2024 मध्ये देशात 59 जातीय दंगली झाल्या. त्यातील 12 दंगली महाराष्ट्रात घडल्या आहेत. 2022 पासून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात जातीय दंगलींमध्ये वाढ झाली. 2024 मध्ये महाराष्ट्रात 12, गुजरात 5, मध्य प्रदेशात 5 आणि राजस्थानात तीन दंगली झाल्या. या दंगली का होतात? कशा होतात? या महाराष्ट्राचा आकडा एवढा वर जातोय. यातून किती अस्वस्थता आपण खाली तयार केली आहे, काम सरकारने करावे, असा सल्ला त्यांनी महायुती सरकारला दिला.

…त्या अधिकाऱ्याला अटक करा

नामदेव ढसाळ कोण आहे, असा प्रश्न विचारला जातो. ⁠आम्ही मागणी केली होती की, त्या अधिकाऱ्याला अटक करा आणि नामदेव ढसाळ यांचं साहित्य वाचायला द्या. ⁠सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू झाला याला पोलिस जबाबदार आहेत. ⁠त्याच्या आईला काय न्याय देणार आपण? अधिवेशन संपत आलं आहे, आता सोमनाथच्या कुटुंबीयांना आपल्याला न्याय द्यावा लागेल, असेही जयंत पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.

Web Title: Jayant patil criticized on maharashtra government over nagpur violence issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 07:57 AM

Topics:  

  • jayant patil
  • Maharashtra Politics
  • Nagpur Violence

संबंधित बातम्या

भाजपसह काँग्रेससमोर अंतर्गत बंडाचं मोठं आव्हान; बंडखोरांपेक्षा नाराज कार्यकर्ते घातक
1

भाजपसह काँग्रेससमोर अंतर्गत बंडाचं मोठं आव्हान; बंडखोरांपेक्षा नाराज कार्यकर्ते घातक

मुंबई महानगरपालिकेत वंचितला काँग्रेसचा ‘हात’; काँग्रेस 143 तर वंचित 46 जागांवर लढवणार निवडणूक
2

मुंबई महानगरपालिकेत वंचितला काँग्रेसचा ‘हात’; काँग्रेस 143 तर वंचित 46 जागांवर लढवणार निवडणूक

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन
3

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन

Haribhau Rathod News: ‘…आणि आमच्याविरोधात अर्ज भरता…’; हरिभाऊ राठोडांचा राहुल नार्वेकरांवर धमकीचा आरोप
4

Haribhau Rathod News: ‘…आणि आमच्याविरोधात अर्ज भरता…’; हरिभाऊ राठोडांचा राहुल नार्वेकरांवर धमकीचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.