
शुक्रवारी दुपारी अश्फाक शेख यांना एका व्यक्तीचा फोन आला. संबंधित व्यक्तीने कोनगाव परिसरातील महामार्गालगत असलेल्या एका इमारतीबाबत माहिती देत स्वस्त दरात घर उपलब्ध असल्याचे सांगितले. घराची किंमत, पेमेंट क्षमता आणि इतर तपशीलांवर दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर अश्फाक शेख यांनी “या ठिकाणी मुस्लिम लोकांना घर मिळेल का?” असा प्रश्न विचारला.
यावर समोरच्या व्यक्तीने “मुस्लिम लोकांना घर मिळणार नाही” असे स्पष्ट सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे उत्तर ऐकल्यानंतर संतप्त झालेल्या अश्फाक शेख यांनी संबंधित व्यक्तीला, “माझं नाव आणि नंबर माहिती असताना मला फोन कसा केला?” असा सवाल केला. त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने दिलगिरी व्यक्त करत कॉल कट केल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर अश्फाक शेख यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधित व्यक्तीची ओळख, तो ज्या बिल्डर किंवा प्रोजेक्टचे नाव घेत होता त्याची सत्यता, तसेच या प्रकरणामागे आणखी कोण आहे का याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.“मुस्लिम लोकांना घर मिळणार नाही असे सांगणारे नेमके कोण आहेत?” असा सवालही कल्याण शहर एम आय मध्ये अध्यक्ष अश्फाक शेख यांनी उपस्थित केला आहे. आता या प्रकरणात पोलिस कोणती भूमिका घेतात आणि चौकशीत काय निष्पन्न होते याकडे लक्ष लागले आहे.
Mira Bhayander : अतिक्रमण झालेल्या झोपड्यांना भीषण आग; निष्काळजीपणामुळे महानगरपालिकेवर टीकेची झोड