Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पर्यटनस्थळी हुल्लडबाजांवर करडी नजर; सातारा जिल्ह्यातील ‘या’ परिसरात पथके नेमणार

सातारा जिल्हा प्रशासनाने आता पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक भूमिका घेतली आहे. अशा पर्यटकांविरोधात मोहीम हाती घेताना त्यासाठी विशेष पथकेही नेमली जाणार आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 02, 2024 | 11:06 AM
पर्यटनस्थळी हुल्लडबाजांवर करडी नजर; सातारा जिल्ह्यातील ‘या’ परिसरात पथके नेमणार
Follow Us
Follow Us:

सातारा : पावसाळ्यात कास, बामणोली, ठोसेघरसह महाबळेश्वर व पाचगणी परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. यामध्ये काही उत्साही पर्यटक हुल्लडबाजी करतात. काही वेळेस ही हुल्लडबाजी त्यांच्याच अंगलट येते. त्याचा रोष मात्र, जिल्हा प्रशासनावर काढला जातो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक भूमिका घेतली आहे. अशा पर्यटकांविरोधात मोहीम हाती घेताना त्यासाठी विशेष पथकेही नेमली जाणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेटी देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्यातही पर्यटक साताऱ्यात येऊन निसर्गाचा आनंद घेतात. यामध्ये कास, बामणोली, ठोसेघर, वाई, महाबळेश्वर व पाचगणी या ठिकाणांना पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात पण गेल्या काही वर्षांपासून या पर्यटकांमध्ये काही हुल्लडबाज व अतिउत्साही पर्यटकांमुळे अनेक छोट्या मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. ज्यातून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पर्यायाने याचा ठपका जिल्हा प्रशासन व पोलिसांवर पडत आहे. पावसाळ्यात या ठिकाणांकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरडी कोसळणे, रस्त्यावर पाणी साचणे, रस्ता घसरडा होणे, लॅण्ड स्लाईडिंग असे प्रकार होतात. यामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

जिल्हा प्रशासन घेणार कडक भूमिका

काही तरुण पर्यटक निसर्गाचा आस्वाद घेताना अतिउत्साहाच्या भरात धोकादायक पाऊल उचलतात. त्यामुळे यातून अनेकांना जीव गमवावा लागतो. अशा उत्साही पर्यटकांवर रोख लावण्यासाठी आता जिल्हा प्रशासन कडक भूमिका घेत मोहीम हाती घेणार आहे. यामध्ये प्रत्येक पर्यटन स्थळाच्या ठिकाणी अशा अतिउत्साही पर्यटकांवर वॉच ठेवला जाणार आहे. त्यासाठी महसूल व पोलिस यंत्रणेचा वापर केला जाणार आहे.

अतिउत्साही युवकांवर कारवाई गरजेची

कास पठारावर पावसाळ्यात येणाऱ्यांची संख्या ही वाढली आहे. यामध्ये दुचाकीवरून येणाऱ्या अतिउत्साही रायडर्सचाही समावेश आहे. काही जण तर मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवताना दिसतात पण पोलिसांचा तपासणी नाका रात्रीच्या वेळी नसल्याने अशा अतिउत्साही युवकांवर कारवाई होत नाही. याबाबतही पोलिस प्रशासनाने भूमिका घेणे गरजेचे आहे.

Web Title: Keep a watchful eye on hooligans at tourist spots teams will be appointed in this area nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2024 | 11:06 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Kas Pathar
  • maharashtra

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.