
या माध्यमातून समाजप्रबोधन, विनोद आणि लोकजीवनाचे वास्तव प्रभावीपणे मांडले जाते, मात्र सध्या अनेक ठिकाणी गाणे लावा अशा मागण्यांनी कार्यक्रमाची दिशा बदलून टाकली आहे. परिणामी, संपूर्ण तमाशा केवळ ऑर्केस्ट्रापर्यंत मर्यादित राहत आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे काही ठिकाणी कलावंतांशी असभ्य वर्तनाचे प्रकार वाढले आहेत. महिलांवर दगडफेक, अश्लील टिप्पणी, लेझर लाइंटचा त्रास तसेच कपडे बदलण्याच्या ठिकाणी डोकावण्यासारख्या घटना समोर येत आहेत. या प्रकारांमुळे महिला कलावंतांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या सन्मानालाही तडा जात आहे.
या सर्व परिस्थितीचा परिणाम तमाशा कलेवर स्पष्टपणे दिसून येतो. आयोजकांकडून पूर्ण तमाशाऐवजी केवळ गाण्यांचे कार्यक्रम ठेवण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे पारंपरिक भाग सादर करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांमध्ये नाराजी वाढत आहे. आमची कला संपत चालली आहे, अशी हळहळ ते व्यक्त करत आहेत. तथापि, अजूनही काही गावांमध्ये तमाशा कलेचा सन्मान राखला जातो, प्रेक्षक शिस्तीत कार्यक्रमाचा आनंद घेतात. हीच सकारात्मक बाजू या कलेसाठी आशेचा परंपरा इतिहासजमा होण्याची भीती होतेय व्यक्त लोककलेचे जतन करणे ही केवळ कलाकारांची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. तमाशा ही केवळ करमणूक नसून सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा, हुल्लडबाज प्रवृत्तीमुळे ही परंपरा इतिहासजमा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सन्मान कलेचा होणे हीच ठरणार खरी जपणूक
तमाशा ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. हुल्लडबाज आणि असभ्य वर्तनामुळे ही कला मरत चालली आहे. कलावंत दुःखी आहेत. गावोगावी सन्मानाने वागणूक मिळाली तरच ही परंपरा जिवंत राहील. प्रत्येक प्रेक्षकाने जवाबदारीने वागणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया तमाशा कलावंत बालम पाचेगावकर यांनी व्यक्त केली.