
2012 मध्ये इचलकरंजीमध्ये दूषित उद्योगांना या प्रदूषणासाठी जबाबदार धरले आहे. इचलकरंजीच्या ‘काळ्या ओढ्या’तून येणारे विषारी पाणी पंचगंगेच्या पात्रात मिसळून नदीचा रंग पूर्णतः काळा झाला असून, यामुळे पर्यावरणाचे अपरिमित नुकसान होत आहे. 2012मध्ये इचलकरंजीमध्ये दूषित आता चर्चा नको, थेट कारवाई हवी ! 12 गेल्या 30 वर्षांपासून आम्ही आंदोलने करत आहोत, मात्र केवळ पोकळ आश्वासने मिळतात. आता आमचा संयम सुटला आहे, अशा भावना अविनाश पाटील, सातगोडा, सुकुमार पुजारी, प्रशांत कुमार, अजित चौगुले आणि त्यांच्या सहका-यांनी व्यक्त केल्या. जर प्रदूषण करणाऱ्या घटकांवर तात्काळ कड़क कारवाई झाली नाही, तर पंचगंगा काढचे सर्व नागरिक सामूहिकरीत्या आमरण उपोषणाला बसतील, असा निर्वाणीचा इशारा यावेळी देण्यात आला.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेकडे लक्ष !
उद्योग भवनातील ‘एमपीसीबी’च्या कार्यालयाने हे निवेदन स्वीकारले असून, आता हे मंडळ केवळ कागदी घोडे नाचवणार की प्रत्यक्ष दौषी उद्योगांवर आणि संस्थांवर कारवाईचा बडगा उगारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.पाण्यामुळे 38 निष्पाप जीवांचा बळी गेला होता. तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही, असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. सध्या केवळ कावीळ किंवा गॅस्ट्रोच नव्हे, तर त्वचारोग आणि शिरोळ तालुक्यात वाढणारा कर्करोग ही चिंतेची बाब बनली आहे. प्रदूषित पाण्यामुळे शेतजमिनींचा पोतही पूर्णपणे बिघडला असून, शेती ही आता नुकसानीची ठरत आहे.