
पंचगंगा नदीवरील बंधारे तळ गाठू लागले नदीपात्रातील पाणी पातळी खालावल्याने पंचगंगा नदीवरील को. प. बंधाऱ्यांची स्थिती गंभीर होत आहे. राजाराम बंधाऱ्याची पातळी 11 फूट 10 इंचापर्यंत खाली आली आहे, तर सुर्वे आणि रुई बंधाऱ्यांमध्येही पाण्याची आवक कमी झाली आहे. इचलकरंजी आणि तेरवाड सारख्या महत्त्वाच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी पातळी शून्य फुटांवर पोहोचल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या तापमानवाढीमुळे वर्षाच्या तुलनेत घट
गेल्या वर्षी याच तारखेला जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 1011.75 दलघमी साठा होता, जो यंदा काहीसा वाढलेला दिसत असला तरी वाढते तापमान आणि बाष्पीभवनामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. विशेषतः राधानगरी धरणातून सध्या 600 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पाण्याचे नियोजन हवे
वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. उपलब्ध पाणीसाठा जून अखेरपर्यंत पुरवण्यासाठी पाटबंधारे विभागाने आतापासूनच पाण्याचे काटकसरीने नियोजन करण्यास सुरुवात केली असून, नदीकाठच्या गावांना पाणी उपशाबाबत सूचना देण्याची शक्यता आहे.