Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raju Shetti: “… याप्रकरणी संबंधितांवर तातडीने कारवाई करावी”; राजू शेट्टींची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अनेक साखर कारखान्यांकडून स्पेंट वॅाश , मळीमिश्रीत पाणी थेट नदीमध्ये सोडले जात आहे. इचलकरंजी शहरातील अनेक प्रोसेस धारकाकडून केमिकलयुक्त पाणी थेट नदीमध्ये सोडले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 11, 2025 | 03:06 PM
Raju Shetti: “… याप्रकरणी संबंधितांवर तातडीने कारवाई करावी”; राजू शेट्टींची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Follow Us
Close
Follow Us:

इचलकरंजी: कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने ,एम. आय. डी. सी. , महापालिका तसेच इचलकरंजी शहरातील प्रोसेस मधून थेट दुषित पाणी पंचगंगा व वारणा नदीत सोडण्यात येत असल्याने दोन्हीही नद्यामधील पाणी प्रदूषित झाले असून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेकडे केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या प्रदुषणात दिवसेंदिवस वाढ होत असून सदर बाब जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळातील अधिकारी जिल्ह्यातील प्रदुषण करणा-या कारखान्यांवर कारवाई न करता अधिका-याकडून कारवाईचा फार्स केला जात आहे. विशेषता जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांकडून स्पेंट वॅाश , मळीमिश्रीत पाणी थेट नदीमध्ये सोडले जात आहे. इचलकरंजी शहरातील अनेक प्रोसेस धारकाकडून केमिकलयुक्त पाणी थेट नदीमध्ये सोडले जात आहे.

नवीन नियमानुसार त्यांना झेडएलडी (झिरो लिक्विड डिस्चार्ज) प्रकल्प राबविण्यास सांगण्यात आले आहे. मात्र अनेक प्रोसेस धारकाकडून प्रक्लपाचा कमी डिस्चार्ज दाखवून जादा डिस्चार्ज सोडल्याने यावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही.जिल्ह्यातील नद्या प्रदुषणाबाबत प्रशासन व शासनाने गांभीर्याने घेणे गरजेचे असून कारवाईचा फार्स करून प्रदुषण महामंडळातील अधिकारी जिल्ह्यातील कारखानदाराकडून हप्ते गोळा करण्यापुरते मर्यादित राहिले आहेत. ऐन उन्हाळ्यात नदी पात्रातील पाणी कमी होवू लागल्याने प्रदुषणाचा प्रश्न गंभीर होणार असून कावीळसारखे अनेक साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे.

साखर कारखाने ,एम. आय. डी. सी. , महापालिका तसेच इचलकरंजी शहरातील प्रोसेस मधून थेट केमिकलचे दुषित पाणी पंचगंगा नदीत सोडल्याने परिसरातील पिके , भाजीपाला व इतर घटकावर मोठा परिणाम झाला आहे. लेड , अल्काईन , फॅास्परस यासारख्या केमिकलचे अंश पाणी , माती , भाजीपाला मध्ये आढळून आले असून याबाबत जिल्हाधिकारी यांनी पंचगंगा नदीकाठावरील पाणी , माती , भाजीपाला यांची तपासणी करून याबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्यासाठी सदरचा तपासणी अहवाल शासनास सादर करणे गरजेचे असल्याची मागणी यावेळी शेट्टी यांनी केली.

Web Title: Raju shetty demanded action against those polluting water of panchganga and warna rivers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • kolhapur
  • kolhapur news
  • Raju Shetti

संबंधित बातम्या

Kolhapur News : 1200 गावांत पहिल्यांदा झाले ‘Deemed ANA’; जिल्ह्यातील 3  लाख नागरिकांना मिळणार थेट फायदा
1

Kolhapur News : 1200 गावांत पहिल्यांदा झाले ‘Deemed ANA’; जिल्ह्यातील 3 लाख नागरिकांना मिळणार थेट फायदा

Satara News : कर्जबुडवणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई होणार; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा इशारा
2

Satara News : कर्जबुडवणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई होणार; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा इशारा

Kolhapur News: चेंडू आणायला गेला अन् सगळचं संपलं…, क्रिकेट खेळताना 13 वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू
3

Kolhapur News: चेंडू आणायला गेला अन् सगळचं संपलं…, क्रिकेट खेळताना 13 वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू

Kolhapur News : जनहित याचिकेची प्रशासनाने घेतली गंभीर दखल; रस्तेदुरुस्तीसाठी मनपाचं सकारात्मक पाऊल
4

Kolhapur News : जनहित याचिकेची प्रशासनाने घेतली गंभीर दखल; रस्तेदुरुस्तीसाठी मनपाचं सकारात्मक पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.