
Konkan Railway, Indian Railways, Maharashtra News, R
अनेक वर्षांपासून देशभरातील प्रवाशांना सुलभ आणि परवडणारा प्रवास उपलब्ध करून दिला आहे. पण केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे मात्र महाराष्ट्रात वाढता असंतोषाचे वारे वाहू लागले आहेत. रेल्वे सेवा अधिकाधिक उत्तर भारतावर केंद्रित होत असून, महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
Indian Stock Market: जागतिक तणावामुळे बाजारावर दबाव; परदेशी गुंतवणूकदारांची बाजारातून माघार
होळी आणि उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने उत्तर भारताकडे जाणाऱ्या विशेष गाड्यांची संख्या वाढवली आहे. सीएसएमटी-मडगाव आणि एलटीटी-मडगाव गाड्या आता साप्ताहिक करण्यात आल्या आहेत, तर सीएसएमटी-गोरखपूर आणि एलटीटी-दानापूर गाड्या दररोज धावत आहेत. दादर-गोरखपूर गाडी आठवड्यातून चार दिवस, तर दादर-बलिया गाडी आठवड्यातून तीन दिवस धावेल.
मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस
मनमाड-मुंबई गोदावरी एक्सप्रेस
भुसावळ मुंबई पॅसेंजर
पुणे-कर्जत-पनवेल पॅसेंजर
मुंबई-विजापूर पॅसेंजर
पुणे-पनवेल पॅसेंजर
पुणे-भुसावळ एक्सप्रेस (पनवेल मार्ग)
दादर-रत्नागिरी पॅसेंजर (बंद, दिवा-रत्नागिरी मार्गाऐवजी)
साधे पाव खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत ठेचा पाव, वाढेल जिभेची चव
कोकण प्रवाशांना सर्वात मोठा फटका बसला आहे. २०२० पूर्वी धावणारी आणि हजारो लोकांसाठी जीवनवाहिनी असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्याऐवजी, दादर-गोरखपूर ट्रेन कायमस्वरूपी पुन्हा सुरू करण्यात आली.
महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या प्रदेशांना जोडणाऱ्या आंतरराज्यीय रेल्वेगाड्या सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि धार्मिक प्रवासासाठी या गाड्या महत्त्वपूर्ण आहेत. या सेवा बंद केल्यामुळे किंवा कमी केल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे.