
Latur News: लातूरमध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचा बिगुल वाजला! 10 सरपंच आणि 58 सदस्यपदांसाठी 28 एप्रिलला मतदान
अर्ज मागे घेण्याची मुदत १७ एप्रिल अशी आहे. याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. आवश्यकता भासल्यास २८ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून, २९ एप्रिल रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. पोटनिवडणूक जाहीर झालेले १० सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार असून, त्यामध्ये (आरक्षण) अहमदपूर तालुक्यातील मावलगाव (ना.मा.प्र.), किनगाव (अ. जाती स्त्री), जळकोट तालुक्यातील येवरी (ना.मा.प्र.), लातूर तालुक्यातील बोपला (अ. जाती स्त्री), भोईसमुद्रगा (ना.मा.प्र.), गंगापूर (अ. जाती स्त्री), औसा तालुक्यातील गांजनखेडा (आ. जमाती), किनीनवरे (आ. जाती), गोंद्री (ना.मा.प्र.) आणि बोरसुरी (आ. जाती स्त्री) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ही पदे रिक्त राहण्याची अनेक कारणे असून त्यामध्ये अपात्रता, राजीनामे, संबंधित सदस्यांचे निधन, मतदानावर बहिष्कार, अप्राप्त नामनिर्देशन, निवडणुकीच्या वेळी जागा भरलेली नसणे वगैरे कारणांचा समावेश आहे.
सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षणाचा ध्यास! नांदेड जिल्हा परिषदेचा २३ कोटी २६ लाखांचा अर्थसंकल्प सादर
काही रिक्त सदस्यपदे असणाऱ्या ५८ ग्रामपंचायतीमध्ये गुंजोटी, वळसंगी, गंगाहिप्परगा, सावरगाव (रो), सांगवी (सु), बाबळदरा, हिप्पळगाव, गुत्ती, बोळेगाव (खु), आनंदवाडी, अजनसौंडा (खु), बोथी, जानवळ, मुरढव, इटी (ना), कोष्टगाव, लखमापूर, बॉबळी (खु), वडमुरंबी, बोरोळ, भातखेडा, रायवाडी, बिंदगिहाळ, सावरगाव, भोईसमुद्रगा, मुरुड, रावणगाव, नेत्रगाव, देऊळवाडी, शेकापूर, गांजनखेडा, भंगेवाडी, येल्लोरीवाडी, हिप्परगा (क), वरवडा, तावशीताड, येळी/देवंग्रा, वडजी, कवळी, शिरसी (हं), शेळगी, येळणूर, चिचोंडी, हलगरा, गुंजरगा, शिराढोण, धानोरा, हंगरगा सिरसी, मिरगनहाळी, गणेशवाडी, बेवनाळ आणि दैठणा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
राज्यातील ग्रामपंचायतीतील सदस्य थेट सरपंचांचे निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे ३१ जानेवारी २०२६ पर्यंत रिक्त झालेल्या या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी आयोगाच्या समक्रमांकाच्या संदर्भ क्रमांक ३ वरील आदेशान्वये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ते निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत या संपूर्ण काळात आचारसंहिता लागू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.