Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोशीर धरणाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध, प्रशासकीय मान्यता रद्द करण्याची केली मागणी

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयात राज्य शासनानकडून 6394.13 कोटी रकमेची मंजुरी दिली असून प्रशासकीय मान्यता देताना शासनाने प्रकल्पग्रस्त, भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 27, 2025 | 06:49 PM
पोशीर धरणाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध, प्रशासकीय मान्यता रद्द करण्याची केली मागणी (फोटो सौजन्य-X)

पोशीर धरणाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध, प्रशासकीय मान्यता रद्द करण्याची केली मागणी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

कर्जत : कर्जत तालुक्यातील पोश्री नदीवर बोरगाव येथे मध्यम धरण बांधले जाणार आहे. या पोशीर धरणाला शासनाने मान्यता दिली असून सदर प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन स्थानिक शेतकऱ्यांनी शासनाला दिले.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून बदलापूर अंबरनाथ दिशेकडे कडे वाहणारी उल्हास नदीची उपनदी पोश्री नदीवर पोशीर धरण प्रकल्प बांधला जाणार आहे. राज्य सरकारने 19 मे 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयात राज्य शासनानकडून 6394.13 कोटी रकमेची मंजुरी दिली असून प्रशासकीय मान्यता देताना शासनाने प्रकल्पग्रस्त, भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. शेतकऱ्यांचा कुठलाही विचार न करता शासनाने हाती घेतलेले हे धोरण रद्द करून तात्काळ पोशीर प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता रद्द करावी अशी मागणी पोशीर प्रकल्प संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने कर्जत तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली.

वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर सकल मराठा समाजाचा मोठा निर्णय; केला ‘हा’ महत्वाचा ठराव

प्रकल्प ग्रस्त संघर्ष समिती यांच्या म्हणणयाप्रमाणे या प्रकल्पामध्ये सुमारे २१९२ हेक्टर जमीन बुडीत क्षेत्र असून यामध्ये सुमारे ९७१ हेक्टर जमीन ही केंद्र शासनाची राखीव वने म्हणून आहे. इतर १२२१ हेक्टर स्थानिक शेतकऱ्यांची लागवडी खाली असलेली शेती आहे. यामध्ये कर्जत तालुक्यातील दुर्गम भाग असण्याऱ्या ओलमन आणि नांदगाव तसेच खांडस ग्रामपंचायत हद्दीतील प्रामुख्याने बोरगांव, चई, चेवणे, ओलमन, बोन्डेशेत, पेंढरी, भोपळे वाडी, झुगरे वाडी, ऐनाची वाडी, चाफेवाडी कोतवाल वाडी, नांदगाव, बळीवरे खांडस अशी आठ महसूली गावे आणि काही आदिवासी वाड्या देखील आहेत. यामध्ये सुमारे १० हजार कुटुंब या गावांमध्ये वास्तव्य करत आहेत. येथील स्थानिक शेतकरी शेतीवर अवलंबून असून शेतीमध्ये विविध प्रकारची पिके घेत असतात. त्यासोबतच काही शेतकरी भाजीपाला लागवड करून यातच आपला उदर निर्वाह करत असतात. या अशा सुजलाम सुफलाम गावांमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येऊ नये अशी प्रमुख मागणी आम्ही सर्व शेतकरी करत आहोत अशा आशयाचे निवेदन बोरगाव,चई, भोपळे वाडी,बोंडेशेत येथील शेतकऱ्यांनी दिले आहे.

सुधाकर घारे यांचे सोशल इंजिनिअरिंग, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून बळ

Web Title: Local farmers oppose the poshir dam and have demanded the cancellation of the administrative approval

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 06:49 PM

Topics:  

  • farmer
  • Karjat
  • maharashtra

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.