
महाराष्ट्र जगात ३०वी अर्थव्यवस्था
मुंबई : जगातील देशांचा विचार केला तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आज ३० व्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रीया, थायलंड, बांगलादेश या देशांना आपण मागे टाकले आहे. देशाच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक म्हणजे १४.९ टक्के हिस्सा आपला आहे. देशाच्या जीडीपीपेक्षा आपला ग्रोथ रेट जास्त आहे. एफडीआय, स्टार्टअप, यूनिकॉन, वृक्षकांच्या बीजांतीसटी देशात पहिल्या क्रमांकावर आहोत.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता ६६० बिलियनवर पोहोचली आहे. आता ३४० बिलियन अजून पाहिजेत. २०२९ पर्यंत आपली अर्थव्यवस्था १ ट्रिलियनपर्यंत पोहोचणारच. २०४७ मध्ये आपण ५ ट्रिलियनपर्यंतदेखील निश्चित पोहोचू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र वेगळे राष्ट्र असते तर जगातील ३० वी मोठी अर्थव्यवस्था राहिली असती. ऑस्ट्रीया, थायलंड, बांगलादेश आदी देशांपेक्षा आपली अर्थव्यवस्था मोठी झाली आहे. पुढच्या दोन ते तीन वर्षांत यूएई, सिंगापूरला पण आपण मागे टाकू.
मुख्यमंत्री म्हणाले, “आपल्या जलआराखड्यात महाराष्ट्राची अंतिम सिंचन क्षमता ८१ लाख हेक्टर इतकी अंदाजित केली आहे. यात नदीजोड प्रकल्प पकडला नाही, तो धरला तर आणखीन वाढ होईल. मराठवाड्याची अंतिम सिंचन क्षमता १७ लाख हेक्टर असून त्यातील १२.६८ लाख तयार केली आहे. ११० लघू तर ६९ मोठे प्रकल्प पूर्ण केले. उल्हास खोऱ्याचे पाणी मराठवाड्यात नेण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा प्री फिजिबिलीटी अहवाल आला आहे. ७८ टीमएसी पाणी हे उल्हास खोऱ्यातून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात नेण्यात येईल.”
राजकोषीय तूट केवळ २.७८ टक्क्यांवर
आपले उत्पन्नाशी निगडित कर्जाचे प्रमाण १८.२ टक्के इतके योग्य निकषांत बसणारे आहे. कर्जाचा आकडा सांगताना उत्पन्न वाढल्याकडेही विरोधकांनी पाहावे, असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मारला. राजकोषीय तूट ही ३ टक्क्यांच्या आत असली पाहिजे. महाराष्ट्राने लाडकी बहीण, शेतकरी मोफत वीज योजना राबवूनही २.७८ टक्क्यांपर्यंत राजकोषीय तूट राखण्यात यश मिळवले आहे. महसूली तूट १ टक्क्याच्या आत ठेवण्यात यश आले आहे. महसूली जमा २०१३-१४ साली १ लाख ५५ हजार कोटी होती. आता ६ लाख १६ हजार कोटींवर पोहोचली आहे. भांडवली खर्च २ लाख कोटी आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ड्रॅगनच्या दारात भारताचे ‘यमदूत’! BrahMos आणि Akashच्या जोडीने फिलीपिन्स अभेद्य; चीनच्या नौदलाला पळता भुई थोडी