Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाराष्ट्र जगात 30 वी अर्थव्यवस्था; ऑस्ट्रिया, थायलंड, बांगलादेशला टाकले मागे’; मुख्यमंत्र्यांची माहिती

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता ६६० बिलियनवर पोहोचली आहे. आता ३४० बिलियन अजून पाहिजेत. २०२९ पर्यंत आपली अर्थव्यवस्था १ ट्रिलियनपर्यंत पोहोचणारच. २०४७ मध्ये आपण ५ ट्रिलियनपर्यंतदेखील निश्चित पोहोचू.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 12, 2026 | 07:35 AM
महाराष्ट्र जगात ३०वी अर्थव्यवस्था

महाराष्ट्र जगात ३०वी अर्थव्यवस्था

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : जगातील देशांचा विचार केला तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आज ३० व्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रीया, थायलंड, बांगलादेश या देशांना आपण मागे टाकले आहे. देशाच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक म्हणजे १४.९ टक्के हिस्सा आपला आहे. देशाच्या जीडीपीपेक्षा आपला ग्रोथ रेट जास्त आहे. एफडीआय, स्टार्टअप, यूनिकॉन, वृक्षकांच्या बीजांतीसटी देशात पहिल्या क्रमांकावर आहोत.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता ६६० बिलियनवर पोहोचली आहे. आता ३४० बिलियन अजून पाहिजेत. २०२९ पर्यंत आपली अर्थव्यवस्था १ ट्रिलियनपर्यंत पोहोचणारच. २०४७ मध्ये आपण ५ ट्रिलियनपर्यंतदेखील निश्चित पोहोचू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र वेगळे राष्ट्र असते तर जगातील ३० वी मोठी अर्थव्यवस्था राहिली असती. ऑस्ट्रीया, थायलंड, बांगलादेश आदी देशांपेक्षा आपली अर्थव्यवस्था मोठी झाली आहे. पुढच्या दोन ते तीन वर्षांत यूएई, सिंगापूरला पण आपण मागे टाकू.

मुख्यमंत्री म्हणाले, “आपल्या जलआराखड्यात महाराष्ट्राची अंतिम सिंचन क्षमता ८१ लाख हेक्टर इतकी अंदाजित केली आहे. यात नदीजोड प्रकल्प पकडला नाही, तो धरला तर आणखीन वाढ होईल. मराठवाड्याची अंतिम सिंचन क्षमता १७ लाख हेक्टर असून त्यातील १२.६८ लाख तयार केली आहे. ११० लघू तर ६९ मोठे प्रकल्प पूर्ण केले. उल्हास खोऱ्याचे पाणी मराठवाड्यात नेण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा प्री फिजिबिलीटी अहवाल आला आहे. ७८ टीमएसी पाणी हे उल्हास खोऱ्यातून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात नेण्यात येईल.”

राजकोषीय तूट केवळ २.७८ टक्क्यांवर

आपले उत्पन्नाशी निगडित कर्जाचे प्रमाण १८.२ टक्के इतके योग्य निकषांत बसणारे आहे. कर्जाचा आकडा सांगताना उत्पन्न वाढल्याकडेही विरोधकांनी पाहावे, असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मारला. राजकोषीय तूट ही ३ टक्क्यांच्या आत असली पाहिजे. महाराष्ट्राने लाडकी बहीण, शेतकरी मोफत वीज योजना राबवूनही २.७८ टक्क्यांपर्यंत राजकोषीय तूट राखण्यात यश मिळवले आहे. महसूली तूट १ टक्क्याच्या आत ठेवण्यात यश आले आहे. महसूली जमा २०१३-१४ साली १ लाख ५५ हजार कोटी होती. आता ६ लाख १६ हजार कोटींवर पोहोचली आहे. भांडवली खर्च २ लाख कोटी आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ड्रॅगनच्या दारात भारताचे ‘यमदूत’! BrahMos आणि Akashच्या जोडीने फिलीपिन्स अभेद्य; चीनच्या नौदलाला पळता भुई थोडी

Web Title: Maharashtra is the 30th largest economy in the world says cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 07:26 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Government
  • political news

संबंधित बातम्या

“महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल…”; काय म्हणाले Devendra Fadnavis?
1

“महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल…”; काय म्हणाले Devendra Fadnavis?

धक्कादायक ! तीन महिन्यांत तब्बल 217 शेतकऱ्यांची आत्महत्या; काँग्रेसने साधला सरकारवर निशाणा
2

धक्कादायक ! तीन महिन्यांत तब्बल 217 शेतकऱ्यांची आत्महत्या; काँग्रेसने साधला सरकारवर निशाणा

सातारा जिल्हा परिषद सदस्य अपहरणनाट्य; महाबळेश्वर न्यायालयात सुनावणी
3

सातारा जिल्हा परिषद सदस्य अपहरणनाट्य; महाबळेश्वर न्यायालयात सुनावणी

बोर घाटातील कोंडीमुळे महाराष्ट्राला दररोज 1 कोटींचा फटका; ‘Missing Link’ प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर
4

बोर घाटातील कोंडीमुळे महाराष्ट्राला दररोज 1 कोटींचा फटका; ‘Missing Link’ प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.