
Maharashtra Farmer, Loan Waiver Amount Deposit,
कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री पाटील म्हणाले, आयटीसी प्रक्रियेतील तांत्रिक कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यास विलंब झाला. मात्र आता संबंधित यंत्रणांनी कामाला गती दिली असून आज किंवा उद्यापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतोही घाईगडबड करू नये किंवा सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
‘आता नवीन वाहने खरेदी करू नका, सरकार डिझेलमध्येही इथेनॉल टाकणार’; माजी मुख्यमंत्र्यांचे मोठं विधान
कर्जमाफीच्या यादीत नाव नसलेल्या शेतक-यांनीही घाबरण्याचे कारण नसल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. ज्या शेतक-यांचे नाव यादीत आलेले नाही, त्यांच्या प्रकरणांची स्वतंत्र पडताळणी करण्यात येईल. कोणत्या कारणामुळे नाव वगळले गेले, याची चौकशी केली जाईल, पात्र असूनही एखाद्या शेतक-यावर अन्याय झाल्याचे आढळल्यास त्याला न्याय दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
नांदेड तालुक्यातील शेतकरी आत्महत्येच्या घटनेबाबत बोलताना सहकार मंत्री महणाले की, या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच सविस्तर भूमिका मांडली जाईल, मात्र कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू, नये. शेतीसाठी विविध आर्थिक सहाय्य योजना, पीकविमा, अनुदान, कर्जमाफीसारख्या योजनांची अंमलबजावणी सुरू अडचणी आल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा.
शासनाच्या योजना, विकासकामे आणि महत्त्वाच्या सूचना आता Public App वर; ठाणे जिल्हा परिषदेचा नवा उपक्रम
कर्जमाफीच्या अंमलबजावणीत झालेल्या विलंबाबाबत त्यांनी स्पष्ट केले की, आयकर भरणारे, शासकीय किया निमशासकीय सेवेत असलेले तसेच नियमांनुसार अपात्र ठरणाऱ्या लाभाथ्यर्थ्यांची माहिती केंद्र सरकारकडून प्राप्त होणे आवश्यक होते, ही माहिती वेळेत उपलब्ध न झाल्याने तसेच ऑनलाइन प्रणालीतील काही तांत्रिक अडचणीमुळे निधी वितरणाला विलंब झाला. मात्र संबंधित माहिती प्राप्त झाल्यानंतर पडताळणीचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले असून आता निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.