
Sanjay Raut, Sharad Pawar, Supriya Sule
Sanjay Raut News: शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि शशिकांत शिंदे त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. उर्वरित अजित पवार गट आणि शिंदे गट हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पक्ष आहेत. आता त्यांच्या पक्षात ज्या कुरबुरी आहेत त्यावर शिवसेनेने का बोलाव. शरद पवारांचा पक्ष हा महाविकास आघाडीतील पक्ष आहे. अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्यांची प्रतिक्रीया दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष भाजप प्रणित महायुतीत दाखल होण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा चर्चा सुरू आहेत. या चर्चांवर संजय राऊत यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.
Chhatrapati Sambhajinagar: पाणीप्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात! वाढीव पाणीपुरवठा रखडला;
संजय राऊत म्हणाले की, ” शरद पवार यांच्या पक्ष हा महाविकास आघाडीतील एक अत्यंत महत्त्वाचा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातील घडामोडींकडे आमचे लक्ष असणे साहजिक आहे. काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी या सर्व चर्चा अफवा असल्याचे सांगितले आहे. सध्या सर्वच पक्ष अडचणींच्या काळातून जात आहेत. शिवसेना, शरद पवार यांच्या समोरही अडचणी आहेत. प्रत्येक पक्षासमोर काही ना काही अडचणी आहेत. शिंदे गट, शिवसेना (ठाकरे गट), आम्ही आणि भाजप या सर्वांनाच अडचणी आहेत. सुनेत्रा पवार यांच्याही गटात अडचणी आहेत. इतकचं नाही तर मिंधे गट आणि भाजपमध्येही अडचणी आहेत.”
दिल्लीतही अडचणी आहेत. आम्ही आमच्या पक्षाचा पुढील मार्ग कसा असावा, यावर काम करू. शरद पवार हे महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या पक्षातील अडचणी दुर करायला ते समर्थ आहेत. एवढचं सांगतो. पण बाह्य शक्तींकडून जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या जात आहेत. प्रत्येक अडचणीमागे बाह्य शक्ती आहेत आणि त्या शक्ती म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे आहेत. देशभरातील प्रादेशिक पक्षांना स्थैर्य यावं, विरोधी पक्षांनी त्यांची भूमिका बजावावी, असे या दोघांनाही वाटत नाही.
Union Cabinet Expansion: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर; अमित शाहांसोबत महत्त्वाच्या बैठकीने
जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या भेटीच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “जयंत पाटील हे शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर काम करणारे नेते आहेत. ते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा पगडा आहे. ते ज्या भागातून येतात तो क्रांतीकारण आणि स्वातंत्र्य चळवळीचा महत्त्वाचा भाग आहे. जयंत पाटील त्याचविचारांच्या मुशीत तयार झालेले आहेत. जातीय आणि धर्मांध शक्तींसोबत ते जातील असे त्यांच्या शत्रुंनाही वाटणार नाही. जयंत पाटील यांच्याकडे जी क्षमता आहे, ती सध्या विधानमंडळात असलेल्या अनेकांपेक्षा अधिक आहे. त्यांची संख्या १० असली, तरी ते पुरोगामी विचारांचे आमदार आहेत.