
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये १३ ते १५ ऑगस्ट २०२३ च्या दरम्यान या तीन दिवसांच्या कालावधीत दररोज ध्वजारोहण करण्याचे निर्देश दिले होते. शाळांच्या इतिहासात सलग तीन दिवस दररोज तिरंगा फडकवला जाण्याची ही पहिलीच वेळ ठरली होती. आणि भारतच्या इतिहासात सुद्धा ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची ठरली होती.
राज्य शासनाने अचानक दिला होता हा निर्णय..
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) पाठवलेल्या सूचनांनुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुरुवातीला १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान उपक्रम राबवताना केवळ १५ ऑगस्ट रोजीच मुख्य ध्वजारोहण करावे, असा आदेश सकाळी काढला होता. मात्र, वरिष्ठांच्या सुधारित सूचनांनुसार संध्याकाळी हा निर्णय बदलून तिन्ही दिवस रोज ध्वजारोहण करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. एकाच दिवशी दोन वेगवेगळे आदेश आल्यामुळे शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांमध्ये काही काळ संभ्रमाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
शाळांमध्ये या वर्षीही साजरा केले जातेय तीन दिवस झेंडावंदन
याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीही राज्यभरातील शाळांमधील तीन दिवस ध्वजारोहण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विद्यार्थी देशभक्तीपर गीते, रांगोळी, चित्रकला स्पर्धा, निबंध आणि वक्तृत्त्व स्पर्धा यांमध्ये जोमाने भाग घेत आहेत आणि स्वातंत्र्यदिनाची तयारी मोठ्या जल्लोषात करत असल्याव्चे दिसून येत आहे.
गावागावातील शाळा, अंगणवाड्या, प्रशासकीय कार्यालये तिरंगा फडकावून प्रभातफेरी काढल्या जात आहेत. विद्यार्थानाही स्वातंत्र्यदिनाची एका दिवसाची हौस आता पाहायला गेले तर तीन दिवस अनुभवायला मिळत आहे हे नक्की.