Pune Suger Producation: राज्यात ९५ लाख टन साखर उत्पादन; १२६ कारखान्यांची धुराडी बंद
९५.६९ लाख टन साखर उत्पादन आणि १,०१० लाख टन ऊस गाळप पूर्ण.
कोल्हापूर विभाग ११.०१% उताऱ्यासह राज्यात प्रथम क्रमांकावर
२१० पैकी १२६ कारखान्यांचे गाळप पूर्ण, ८४ कारखाने अद्याप कार्यरत.
Pune Suger Producation: राज्यातील चालू साखर गाळप हंगाम संपन्न होण्याच्या टप्प्यात आहे. यंदा सुरू झालेल्या २१० सहकारी व खासगी साखर कारखान्यांपैकी आतापर्यंत १२६ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे १ हजार १० लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून ९५ लाख ६९ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा सरासरी ९.७४ टक्के साखर उतारा नोंदवला गेला आहे. साखर आयुक्तालयाकडून या वर्षी २१० कारखान्यांना गाळपाचे परवाने दिले गेले होते. पावसाळा लांबल्यामुळे हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता होती, मात्र मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत १ नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला.
Uttar Pradesh Crime: बाबांनी ६ वेळा केले लग्न…आतातरी थांबवा! अल्पवयीन मुलाने पोलिस स्टेशनमध्ये केली
साखर उताऱ्याच्या बाबतीत कोल्हापूर विभाग आघाडीवर असून येथे ११.०१ टक्के उतारा नोंदवला गेला आहे. त्याखालोखाल पुणे विभागात ९.८४ टक्के, नांदेड विभागात ९.३८ टक्के, अमरावती विभागात ९.३२ टक्के, अहिल्यानगर विभागात ९.०७ टक्के, तर सोलापूर विभागात ८.५७ टक्के उतारा नोंदवला गेला आहे.उपलब्ध उसाचे क्षेत्र तुलनेने कमी असल्यामुळे अनेक कारखान्यांना गाळप क्षमतेइतका ऊस उपलब्ध झाला नाही. त्यामुळे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने यंदा हंगाम मार्च अखेरीस संपेल अशी शक्यता व्यक्त केली होती. आतापर्यंत १२६ कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, ८४ कारखाने अद्यापही सुरू आहेत.
उत्पादनाच्या बाबतीत कोल्हापूर विभागातून सर्वाधिक २३ लाख १० हजार टन साखर तयार झाली आहे. त्याखालोखाल पुणे विभागात २१ लाख ३० हजार टन, सोलापूर विभागात १८ लाख ४८ हजार टन, अहिल्यानगर विभागात ११ लाख ३१ हजार टन, छत्रपती संभाजीनगर विभागात ८ लाख ८४ हजार टन, तर नांदेड विभागात १ लाख १४ हजार टन आणि अमरावती विभागात १ लाख १० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे.राज्यातील साखर कारखान्यांनी हंगामात एकूण उत्पादन क्षमता पूर्ण करत राज्याला साखरेच्या पुरवठ्यात स्थिरता उपलब्ध करून दिली आहे.






