Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात मोठं जलसंकट; बीडला सर्वाधिक फटका, 173 लहान-मोठ्या जलाशयांपैकी 81 पूर्णपणे कोरडेच

जिल्ह्यातील १७३ लहान-मोठ्या जलाशयांपैकी ८१ पूर्णपणे कोरडे पडले आहेत, तर ७९ जलाशय 'डेड स्टोरेज' स्थितीत पोहोचले आहेत. सध्या केवळ १३ जलाशयांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून तोही पुढील काळासाठी अपुरा मानला जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 23, 2026 | 12:04 PM
राज्यात मोठं जलसंकट; बीडला सर्वाधिक फटका,

राज्यात मोठं जलसंकट; बीडला सर्वाधिक फटका,

Follow Us
Follow Us:

बीड : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये यंदा तीव्र जलटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून, बीड जिल्हा या संकटाचे केंद्रबिंदू ठरत आहे. एल निनोचा प्रभाव आणि कमकुवत मान्सूनमुळे जिल्ह्यातील पाणीसाठे आटत चालले आहेत. जून महिना अर्धा उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

जिल्ह्यातील १७३ लहान-मोठ्या जलाशयांपैकी ८१ पूर्णपणे कोरडे पडले आहेत, तर ७९ जलाशय ‘डेड स्टोरेज’ स्थितीत पोहोचले आहेत. सध्या केवळ १३ जलाशयांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून तोही पुढील काळासाठी अपुरा मानला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये ग्रामीण भागातील नागरिक कोरड्या तलावांमध्ये खड्डे खोदून पाणी शोधताना दिसत आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी लांब अंतर पार करावे लागत असून, टँकरवर अवलंबित्व वाढले आहे.

Maharashtra Rain Update : मुंबईकरांनो सावधान ! पुढील 2-3 तास महत्त्वाचे; वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. जलस्रोतांमधून बेकायदेशीररीत्या पाणी उपसा करणाऱ्यांविरुद्ध थेट एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अशा प्रकरणांमध्ये संबंधित ठिकाणचे वीज कनेक्शन तातडीने तोडण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

शेतीवरही संकट

जलटंचाईचा फटका शेती क्षेत्रालाही बसत आहे. अनेक गावांतील सिंचन व्यवस्था ठप्प झाली असून, खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिकांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. जनावरांसाठी चारा आणि पाण्याची टंचाईही गंभीर बनली आहे.

विविध शहरांत पाणीपुरवठा नियमित नाही

उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याची मागणी वाढली असली तरी पुरवठा घटत आहे. लातूर जिल्ह्यातील औसा शहरात तब्बल १२ दिवसांनी एकदा पाणीपुरवठा होत आहे. तर नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये १३ दिवसांच्या अंतराने नळांना पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना पिणे, स्वयंपाक आणि दैनंदिन वापरासाठी पाणी जपून वापरावे लागत आहे. जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करणेही मोठे आव्हान ठरत आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक गंभीर स्थिती

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. शेकडो गावांमध्ये नागरिक टँकरची वाट पाहताना दिसत आहेत. आधीच दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात यंदाच्या कमी पावसाने आणि प्रदीर्घ उष्णतेने परिस्थिती आणखी बिकट केली आहे. कमी पर्जन्यमान आणि कोरड्या हवामानामुळे विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोत झपाट्याने आटत असून ग्रामीण भागातील अडचणी वाढत आहेत.

Web Title: Major water crisis in maharashtra beed is the worst hit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Beed News
  • Maharashtra Rain
  • Rain News
  • Water Issue

संबंधित बातम्या

Car Stuck in Water: पाण्यात कार बंद पडलीये? घाबरू नका! ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा
1

Car Stuck in Water: पाण्यात कार बंद पडलीये? घाबरू नका! ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा

‘अल-निनो’चा वाढता प्रभाव शेतकऱ्यांसाठी धोक्याचा; अपेक्षित पाऊस न झाल्याने दुबार पेरणीची टांगती तलवार
2

‘अल-निनो’चा वाढता प्रभाव शेतकऱ्यांसाठी धोक्याचा; अपेक्षित पाऊस न झाल्याने दुबार पेरणीची टांगती तलवार

महाराष्ट्रात मान्सूनची तारीख अखेर ठरली; ‘या’ तारखेनंतर राज्यात मुसळधार पाऊस होणार?
3

महाराष्ट्रात मान्सूनची तारीख अखेर ठरली; ‘या’ तारखेनंतर राज्यात मुसळधार पाऊस होणार?

पाणीपुरवठा योजनेतील विलंबावरून हायकोर्ट तीव्र नाराज; कंत्राटदार आणि ‘मजीप्र’ला एकत्र बसून तोडगा काढण्याचे आदेश
4

पाणीपुरवठा योजनेतील विलंबावरून हायकोर्ट तीव्र नाराज; कंत्राटदार आणि ‘मजीप्र’ला एकत्र बसून तोडगा काढण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.