
Mhaswad News, Satara News, Crime News, Local News
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनादिलेल्या निवेदनात सोनवणे यांनी मुख्याधिकाऱ्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत, अनेक ठिकाणी झालेल्या विकासकामाचा दर्जा न तपासता बीले काढुन संबंधित ठेकेदाराला अदा केली आहेत, तर पोलीस स्टेशन परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे एकाच महिन्यात दोन वेळा काम करुनही सदर ची जल वाहिनीला ५ ठिकाणी गळती कशी काय लागते ? असा सवाल उपस्थित केला.
BJP New National Team: भाजपच्या नव्या राष्ट्रीय टीममधून 2029च्या निवडणुकीची रणनीती
त्याठिकाणी लाखो लिटर पाणी वाया जात आहे. शहरात प्रशासनाच्या कार्यकाळात अनेक विनापरवाना बांधकामे झाली असून त्यामध्ये मोठी तडजोड झाल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे. ज्या बांधकामांना परवानगी दिली आहे ती परवानगीपेक्षाही अधिक मोठी झाली असून त्याचा सामान्य नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील विठ्ठल, रुक्मिणी मंदिर ते कासार बोळ या दरम्यान जेसीबीच्या साह्याने रस्ता मधोमध खोदुन त्याठिकाणी वाढीव पाणी पुरवठा योजनेची जल वाहिनी टाकली मात्र त्यानंतर तो रस्ता कॉक्रीट केला नाही, तर त्यावर फक्त मुरुम टाकण्यात आला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ते मरीआई माता मंदिर या दरम्यान पालिकेने केलेल्या रस्त्याचे निकृष्ट काम करण्यात आले आहे, एप्रिल व मे या २ महिन्यात शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची लाखो रुपयांची बीले काढण्यात आली आहेत, किती पाणी वाटले याची चौकशी केली असता प्रशासनाकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. पालिकेच्या जागेत रोज अतिक्रमण वाढत असून त्याकडे मुख्याधिकारी दुर्लक्ष करीत असून त्यांना पाठीशी घालत आहेत. या सह अन्य अनेक आरोप सोनवणे यांनी केले असून यासाठी मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्यावर जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पावसाळ्यात कान आणि सायनसच्या संसर्गाचा का वाढतो धोका? संसर्ग टाळण्यासाठी अशी पद्धतीने घ्या काळजी