
या पार्श्वभूमीवर युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर टीका केली आहे. त्यांनी थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करत म्हटले आहे की, “मोठमोठ्या होर्डिंग्ससाठी ‘लाडक्या बहिणी’ आणि ‘लाडक्या भावासाठी’ खर्च करण्यासाठी सरकारकडे निधी आहे; मात्र पोलीस भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सभागृह किंवा तात्पुरती निवास व्यवस्था करण्यासाठी निधी का उपलब्ध होत नाही?”युवा काँग्रेसने प्रशासनाने तात्काळ शाळा, महाविद्यालयांची सभागृहे किंवा क्रीडांगणे उपलब्ध करून द्यावीत, तसेच पाणी व स्वच्छतेची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.दरम्यान, स्थानिक प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसून उमेदवारांच्या सोयीसाठी काय पावले उचलली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.