Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अयोध्येसाठी मनसेचे थेट पंतप्रधानांना पत्र; बाळासाहेबांचे नाव घेत केली खास मागणी

येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी तब्बल आठ हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत खास मागणी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 04, 2024 | 07:11 PM
अयोध्येसाठी मनसेचे थेट पंतप्रधानांना पत्र; बाळासाहेबांचे नाव घेत केली खास मागणी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – देशवासियांना सध्या अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर (Ram Mandir) उद्घाटनाची उत्सुकता लागली आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली असून येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी तब्बल आठ हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, मनसेने (MNS)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव घेत खास मागणी केली आहे.

मनसेचे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी हे पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी मोदींना अयोध्येतील मुख्य चौकाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावी अशी मागणी केली आहे. राम मंदिर हे अनेक आंदोलनानंतर आणि प्रयत्नांनंतर तयार होत आहे. या प्रयत्नांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची सक्रिय भूमिका असून विशेष सहभाग होता. याची आठवण पंतप्रधानांना करुन देत नारकर यांनी मागणी केली आहे. राम मंदिर निर्माणच्या कार्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान मोलाचे होते. यामुळे अयोध्येतील मुख्य चौकाला बाळासाहेबांचे नाव देऊन त्यांचा उचित सन्मान करावा असे पत्र सतीश नारकर यांनी पंतप्रधानांना लिहिले आहे.

अयोध्येमध्ये घडलेल्या प्रसंगांची जबाबदारी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. त्यांनी शिवसैनिकांनी हे केले असेल तर मला अभिमान आहे अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे आता या अभूतपूर्व सोहळ्यावेळी मुख्य चौकाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावी अशी मागणी थेट पंतप्रधान मोदी यांना केली आहे.

Web Title: Mns write letter to pm narendra modi for giving name of balasaheb thackeray to ayodhya chowk nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2024 | 07:11 PM

Topics:  

  • ayodhya
  • Ayodhya ram mandir
  • Balasaheb Thackeray
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Ganga Expressway: गुगल मॅप्सवर का दिसेना गंगा एक्सप्रेसवे? पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; 36,000 कोटींचा प्रकल्प तयार पण…
1

Ganga Expressway: गुगल मॅप्सवर का दिसेना गंगा एक्सप्रेसवे? पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; 36,000 कोटींचा प्रकल्प तयार पण…

3.5 किमी एअरस्ट्रीपसह 12 जिल्ह्यांना जोडणारा Ganga Expressway ; दिल्ली, हरियाणा आणि उत्तराखंडलाही मिळणार वेग
2

3.5 किमी एअरस्ट्रीपसह 12 जिल्ह्यांना जोडणारा Ganga Expressway ; दिल्ली, हरियाणा आणि उत्तराखंडलाही मिळणार वेग

“महिला आरक्षणाचे ध्येय मी पूर्ण करणारच”; वाराणसीच्या भूमीतून पंतप्रधान मोदींचा नारी शक्तीला शब्द
3

“महिला आरक्षणाचे ध्येय मी पूर्ण करणारच”; वाराणसीच्या भूमीतून पंतप्रधान मोदींचा नारी शक्तीला शब्द

“ED, CBI आणि… हे मोदींचे ३ पक्के मित्र”; अरविंद केजरीवाल यांचा पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींवर प्रहार
4

“ED, CBI आणि… हे मोदींचे ३ पक्के मित्र”; अरविंद केजरीवाल यांचा पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींवर प्रहार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.