
यावेळी बोलताना लक्ष्मण धनवडे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकास, पायाभूत सुविधा, आत्मनिर्भरता आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठा यामध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे. त्यांच्या कार्याला सूर्यनारायण देवाचा आशीर्वाद लाभला असून देशाच्या प्रगतीसाठी त्यांना अधिक बळ मिळो, हीच प्रार्थना आहे.” ग्रामस्थांनीही मोदी यांनी गेल्या बारा वर्षांत विकासाभिमुख धोरणांद्वारे देशाला नवी उंची दिल्याचे सांगत, भविष्यातही त्यांना देशसेवेची संधी मिळावी आणि भारताच्या विकासाचा प्रवास अधिक वेगाने सुरू राहावा, अशी प्रार्थना केली.
कार्यक्रमास भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर, गहिनीनाथ चव्हाण, नानासो सरवळे, लक्ष्मण कोले, पोपट पाटील, आप्पासो वाघमोडे, हरिभाऊ माने, विठ्ठल माने, बळवंत धनवडे, विष्णूपंत माने, शिवाजी वसेकर, श्रीधर कोळेकर, चंद्रकांत पाटील, नारायण गुंड, मुकुंद घाडगे, बाळू बनसोडे, रमेश कोले, भाऊसाहेब माने, साधू नलवडे, सुनील माने, संदीप हिंगमिरे, ज्ञानेश्वर वाघमोडे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधानपदी सलग ४३९९ दिवस पूर्ण करून एक उल्लेखनीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. या ऐतिहासिक क्षणानिमित्त महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या श्री सूर्यनारायण मंदिरात चरणी लीन होऊन सूर्यनारायण देवाकडे ,देशाला सक्षम, दूरदर्शी आणि विकासाभिमुख नेतृत्व देणारे मोदीजी यांनी यापुढील काळातही भारताचे नेतृत्व करावे, देशाला प्रगतीच्या नव्या शिखरांवर घेऊन जावे.त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्त्यांला काम करण्याचे भाग्य लाभले आहे, याचा अभिमान वाटतो. सूर्यनारायण देवाच्या कृपेने मोदीजींना दीर्घायुष्य, उत्तम स्वास्थ्य आणि अखंड राष्ट्रसेवेची शक्ती लाभो. मा. माऊली हळणवर प्रदेश सचिव, भाजप किसान मोर्चा