Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohan Bhagvat on Hindu: जोपर्यंत हिंदू मजबूत होणार नाहीत तोपर्यंत…; मोहन भागवतांना नेमकं म्हणायचयं काय?

बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचा संदर्भ देत भागवत म्हणाले, "या वेळी या घटनांविरोधात व्यक्त झालेला जनक्षोभ यापूर्वी कधीही पाहायला मिळाला नव्हता. विशेष म्हणजे आता तिथले हिंदूही ठामपणे सांगत आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 25, 2025 | 03:28 PM
Mohan Bhagvat on Hindu: जोपर्यंत हिंदू मजबूत होणार नाहीत तोपर्यंत…; मोहन भागवतांना नेमकं म्हणायचयं काय?
Follow Us
Close
Follow Us:

Hindu-Muslim Politics: “भारताची एकता ही हिंदूंच्या सुरक्षिततेची हमी आहे. हिंदू समाज आणि भारत यांच्यात खोल संबंध असून, हिंदू समाज जबाबदार आणि सक्षम झाला तरच भारताला खरे वैभव प्राप्त होईल.’ असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. इतकेच नव्हे तर, “जोपर्यंत हिंदू समाज स्वतः मजबूत होत नाहीत, तोपर्यंत जगात कोणीही त्यांची चिंता करणार नाही.” असंही त्यांनी म्हटलं आहे. ऑर्गनायझर वीकली या संघाच्या मुखपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत, भागवत यांनी शेजारील देशांमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचारांवर आणि मानवाधिकार संघटनांच्या या संदर्भातील मौनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदू समाजाच्या एकतेवर भर देताना म्हटले आहे की, “जर भारतातील हिंदू शक्तिशाली झाले, तर जगभरातील हिंदूंनाही त्याचा आधार आणि बळ मिळेल.हिंदू समाज आणि भारत हे एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत. त्यामुळे हिंदू समाजाची प्रतिष्ठा ही भारताच्या गौरवाशी थेट संबंधित आहे.जे लोक आज स्वतःला हिंदू मानत नाहीत, तरी एक काळ असा होता की त्यांच्या पूर्वजांचे मूळ हिंदू संस्कृतीतच होते. अशा सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे आणि एकत्र ठेवण्याचे कार्य केवळ एक मजबूत व समावेशक हिंदू समाजच करू शकतो.” तसेच, “जर भारतातील हिंदू समाज मजबूत झाला, तर स्वाभाविकपणे जगभरातील हिंदूंनाही मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बळ मिळेल. हे कार्य सध्या सुरू आहे, आणि जरी ते अद्याप पूर्ण झालेले नसले तरी, हळूहळू ही परिस्थिती विकसित होत आहे.” असंही त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.

‘कभी खुशी कभी गम’मधील छोटी करीना होणार लवकरच आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

हिंदू समाजाची अंतर्गत ताकद वाढत आहे’

बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचा संदर्भ देत भागवत म्हणाले, “या वेळी या घटनांविरोधात व्यक्त झालेला जनक्षोभ यापूर्वी कधीही पाहायला मिळाला नव्हता. विशेष म्हणजे आता तिथले हिंदूही ठामपणे सांगत आहेत. ‘आम्ही पळून जाणार नाही, आम्ही आमच्या हक्कांसाठी लढू . त्यांच्या मते, ही प्रतिक्रिया म्हणजे हिंदू समाजात निर्माण होत असलेल्या अंतर्गत शक्तीचा प्रत्यय आहे. ही वाढती ताकद आणि जनजागृती भविष्यात हिंदू समाजाच्या अधिक सशक्तीकरणाला कारणीभूत ठरेल, असे त्यांनी विश्वासाने सांगितले.

‘हिंदू राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत’

भागवत यांनी हेही स्पष्ट केले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जगभरातील हिंदू समाजाच्या हितासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल, मात्र आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करत. संघाचे स्वयंसेवक धर्म, संस्कृती आणि समाजाचे रक्षण करताना हिंदू राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःला समर्पित करतात आणि त्या उद्दिष्टासाठी कार्य करण्याची शपथ घेतात.”

एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवीच्या आई- वडिलांची भेट; आरोपींवर कठोर कारवाईचं दिलं आश्वासन

‘हिंदू’ या शब्दाचा अर्थ खूप व्यापक

मोहन भागवत म्हणाले की, ‘हिंदू’ या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. काळानुरूप बदलाला वाव आहे. संघाच्या शपथेत असेही म्हटले आहे की “मी संघाचा एक भाग आहे”. याचा अर्थ असा की मी संघटन बांधण्यास मदत करतो. म्हणून, कोणत्याही गोष्टीवर वेगवेगळे मत असण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. जेव्हा सर्वजण एखाद्या गोष्टीवर सहमत असतात तेव्हा प्रत्येकजण स्वतःचे मत विसरून तो निर्णय स्वीकारतो. मग सर्वजण एकत्र काम करतात आणि त्याच दिशेने जातात. आपण कायम टिकणाऱ्या गोष्टी जपतो आणि काळाबरोबर बदलणाऱ्या गोष्टी बदलतो.

 

Web Title: Mohan bhagvat on hindu until hindus become strong mohan bhagwats suggestive statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • hindu-muslim politics
  • mohan bhagwat
  • Rashtriya Swayamsevak Sangh
  • RSS

संबंधित बातम्या

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी
1

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
2

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

RSS100 : “जे ही काम करतात ते मुस्लीमांविरोधातच…; शतकपूर्तीदिनी RSS वर बड्या नेत्याने साधला जोरदार निशाणा
3

RSS100 : “जे ही काम करतात ते मुस्लीमांविरोधातच…; शतकपूर्तीदिनी RSS वर बड्या नेत्याने साधला जोरदार निशाणा

PM Modi ON RSS 100 : राष्ट्र साधनेची 100 वर्षे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा RSS च्या शतकपूर्तीवर खास लेख
4

PM Modi ON RSS 100 : राष्ट्र साधनेची 100 वर्षे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा RSS च्या शतकपूर्तीवर खास लेख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.