Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पवना धरणग्रस्तांचे आंदोलन : जलसंपदा विभागाच्या कार्यालयाला ठोकले टाळे ; विविध मागण्यांसाठी पिंपरी शहराचा पाणीपुरवठा रोखला

मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे, बाधित प्रकल्पग्रस्तांना प्रत्येकी चार एकर जमीन, प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी पवना धरणग्रस्तांच्या वतीने मंगळवारी सकाळी तीव्र आंदोलन करण्यात आले.

  • By Aparna
Updated On: May 10, 2023 | 02:43 PM
पवना धरणग्रस्तांचे आंदोलन : जलसंपदा विभागाच्या कार्यालयाला ठोकले टाळे ; विविध मागण्यांसाठी पिंपरी शहराचा पाणीपुरवठा रोखला
Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे, बाधित प्रकल्पग्रस्तांना प्रत्येकी चार एकर जमीन, प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी पवना धरणग्रस्तांच्या वतीने मंगळवारी सकाळी तीव्र आंदोलन करण्यात आले.

या वेळी संतप्त आंदोलकांनी मोर्चा काढून पवना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाला टाळे ठोकले.त्यामुळे धरणातून पिंपरी चिंचवड शहरासाठी सोडण्यात येणारा पाणीपुरवठा बंद झाला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेऊन तोडगा काढण्यासाचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

मावळ तालुक्यातील पश्चिम भागात पवना धरणाचे काम १९७३मध्ये पूर्ण झाल्यावर खोऱ्यातील २० ते २५ गावे विस्थापित झाली. मात्र, ५० वर्षांत
विविध राजकीय पक्षांची सरकार येऊनही धरण प्रकल्पग्रस्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके, भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, किसान संघाचे अध्यक्ष शंकरराव शेलार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, गणेश धनिवले, लक्ष्मण भालेराव,धरणणग्रस्त संयुक्तसंघटनेचे अध्यक्ष नारायण बोडके, यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलनकर्त्या सहभागी झाले होते.

मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, यांच्यासह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, उपअभियंता अशोक शेटे, पवना धरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुजित कुमार राजगिरे, यांना विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.

लोणावळा ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त

पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात मावळ तालुक्यात १२ वर्षांपूर्वी पुणे मुंबई महामार्गावर आंदोलन झाले या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन शेतकरी मृत्युमुखी पडले. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पवना धरण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Web Title: Movement of pavana dam victims the office of the water resources department was knocked down water supply to pimpri city was stopped for various demands nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2023 | 02:43 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pawana Dam
  • Pune
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.