
होळीसाठी धावणाऱ्या जादा बसफेऱ्यांचे आरक्षण ‘फुल्ल
शिमग्यासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात गर्दी
एसटी महामंडळ 198 जादा बसेस सोडणार
खेड: शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकणवासियांच्या सेवेसाठी लालपरी सज्ज झाली आहे. कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने १९८ जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. बसफेऱ्यांचे आरक्षण ‘फुल्ल’ झाले आहे. ७८ पैकी ३९ बसचे समूह आरक्षण झाले आहे. ५७ फेऱ्या ग्रुप बुकिंग आरक्षणासाठी राखीव ठेवल्या आहेत.
कोकणवासियांच्या मार्गात कोणत्याही प्रकारचा अडथळा येवू नये, यासाठी एसटी प्रशासनाकडून चोख नियोजन केले आहे. रेल्वे प्रशासनापाठोपाठ एसटी प्रशासनानेही कोकणवासियांच्या सेवेसाठी मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा, पनवेल येथील बसस्थानकातून जादा बसफेऱ्या कोकणात दाखल होणार आहेत. या बसफेऱ्या नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त असून कोकणवासियांनी ग्रुप बुकिंगला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे.
मुंबई विभागातून सुटणाऱ्या ७८ तर ठाणेतून सुटणाऱ्या ९१ जादा बसफेऱ्यांचे आरक्षण ‘फुल्ल’ झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागातून गावी दाखल होणाऱ्या कोकणवासियांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे एसटी प्रशासनाने आणखी जादा बसफेऱ्या सोडाव्यात, अशी मागणी होत आहे. २७ फेब्रुवारीपासून जादा बसफेऱ्या कोकणात दाखल होऊ लागल्या आहेत. दि. ५ मार्चपर्यंत बसफेऱ्या धावणार असल्याने जादा कोकणवासियांना दिलासा मिळाला आहे. दि. १ मार्च रोजी – १५० फेऱ्या चालवण्याचे नियोजन केले आहे.
Pratap Sarnaik : डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही; परिवहनमंत्र्यांचा सज्जड दमकोकणासाठी एसटीचा धमाका
मुंबई महानगरातील कोकणवासी होळीनिमित्त कोकणात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने वाहतुकीचे नियोजन केले आहे. एसटीची होळी जादा वाहतूक गुरुवारपासून सुरू झाली. मुंबई विभागातून ७८, तर ठाण्यातून ९१ जादा एसटीचे आरक्षण फुल्ल झाले. रत्नागिरी विभागातून आतापर्यंत सर्वाधिक ५६६ एसटी आरक्षित झाल्या आहेत. २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी रत्नागिरी सर्वाधिक गाड्यांचे तिकिट प्रवाशांनी आरक्षित केले आहेत. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात येते.
Kokan Holi Festival: कोकणासाठी एसटीचा धमाका; रत्नागिरी विभागातून तब्बल…
होळीकरिता जादा गाड्या सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा, पनवेल येथील बसस्थानकांतून गुहागर, खेड, विपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण या भागात जादा एसटी धावणार आहेत. या गाड्या नियमित फे-याव्यतिरिक्त आहेत. मुंबईतील ७८ पैकी ३९ बसचे समुह आरक्षण झाले आहे.