ईबिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड, ही एराया लाईफ़स्पेस लिमिटेडची एक प्रमुख सबसिडरी असून, त्यांचा द्वारे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) सादर करण्यात आले आहे, हा उपक्रम MSRTC) करीता सादर करण्या आला.
एसटीतील अकार्यकारी अधिकाऱ्यांवर मनमानीचे आरोप होत असून,प्रशासनाने नेमलेली चौकशी समिती अर्धवट राहिल्याचा आरोप श्रीरंग बरगे यांनी केला आहे. या प्रकरणामुळे एसटी प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Maharashtra ST Bus Fare Hike : उन्हाळ्यात एसटीने गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एसटी महामंडळाने 15 एप्रिलपासून बसच्या तिकीट दरांत वाढ होणार असल्याची माहिती दिली.
शाळा आणि महाविद्यालयांनी पुन्हा एकदा 'लाल परी'लाच पसंती दिली असून शालेय सहलीतून एसटीला तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. शालेय सहलींनी एसटीची तिजोरी भरली आहे.
महाराष्ट्र सरकारने ई-वाहन धोरण २०२५ अंतर्गत कंपन्या व सार्वजनिक वाहतूक उपक्रमांना कोट्यवधींचे अनुदान मंजूर करून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना दिली आहे.
राज्यात वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रणासाठी परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीत राज्यातील सद्यस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली.
या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना एसटी बस प्रवासातील सवलतींचा लाभ अधिक सुलभतेने मिळणार असून, प्रवास व्यवस्थापन अधिक डिजिटल व पारदर्शक होणार आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत विद्यार्थी,शिक्षक,विविध क्षेत्रातील कर्मचारी आणि कारखान्यातील कामगार मोठ्या प्रमाणात गावाकडे जात असतात.त्यामुळे होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे.
“महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५” अंतर्गत २०३५ पर्यंत एसटीच्या सर्व बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शासनाच्या वतीने परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला.
अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ‘राजमाता जिजाऊ’ या बस सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नव्या बस सेवेची आजपासून सुरुवात करण्यात आली.
‘राजमाता जिजाऊ’ बससेवेच्या समावेशामुळे एसटीच्या ताफ्यात परंपरा आणि प्रगती यांचा सुंदर संगम साधला गेला आहे. लवकरच एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल ३ हजार ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने नव्या स्मार्ट बसेस दाखल…
महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या (MSRTC) सर्व बसेसची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी, सरकारने महसूल वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी अनेक ठोस पावले उचलली आहेत.
आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच खर्च नियंत्रणासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले जात असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.
उन्हाळ्यात शाळा व महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्यामुळे अनेक कुटुंबे गावाकडे किंवा पर्यटनासाठी बाहेर जाण्याचे नियोजन करतात. त्यामुळे रेल्वे आणि खासगी वाहतुकीबरोबरच एसटी बसस्थानकांवरही मोठी गर्दी होत आहे.
अनेक चालक आणि वाहक मद्य प्राशन करून कर्तव्यावर जातात. त्यामुळे बस चालविताना अपघात झाल्यास त्याचा विनाकारण त्रास प्रवाशांना होतो. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वीच अल्कोहोल तपासणी होणार.
MSRTC Electric Buses: एसटी महामंडळाचा ५१५० विजेवरील बस कंत्राटी पद्धतीने भाडे तत्वावर घेण्याचा प्रकल्प अपयशी ठरल्या नंतरही सरकारी अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा होत आहे.
मद्यप्राशन करून ड्युटीवर आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पहिल्या वेळी दोषी आढळल्यास निलंबन, तर वारंवार असे प्रकार घडल्यास सेवासमाप्तीची कारवाई केली जाईल.
वर्ष २०३७ पर्यंत एसटीच्या ताफ्यातील सर्व २२,००० बस पूर्णतः इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारी बस नेटवर्क संपूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे.