Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात ‘मविआ’चे सरकार येणार; ‘मुंबई न्याय यात्रे’दरम्यान खासदार वर्षा गायकवाडांनी व्यक्त केला विश्वास

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. तसेच राज्यात महाविकास आघाडीला सर्वात जास्त जागा मिळाल्या. त्यात काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला आहे. सध्याचे राजकारण हे लाडकी बहीण योजना, राजकोट किल्ल्यावरील दुर्घटना, कायदा व सुव्यस्था याचा उडालेला बोजवारा अशा घटनांभोवंती फिरत आहे. मध्यंतरी काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 05, 2024 | 08:17 PM
राज्यात 'मविआ'चे सरकार येणार; 'मुंबई न्याय यात्रे'दरम्यान खासदार वर्षा गायकवाडांनी व्यक्त केला विश्वास

राज्यात 'मविआ'चे सरकार येणार; 'मुंबई न्याय यात्रे'दरम्यान खासदार वर्षा गायकवाडांनी व्यक्त केला विश्वास

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी केली जात आहे. दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यातील राजकीय वातावरण अनेक मुद्द्यांवरून ढवळून निघत आहे. त्यातच महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने मुंबईत आपली पकड मजबूत करण्यासाठी व महायुती सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरत ‘मुंबई जोडो न्याय यात्रेचे आयोजन केले होते. त्या यात्रेची आज मुंबईत सांगता झाली. यावेळी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी येणाऱ्या निवडणुकीबाबत मोठे भाष्य केले आहे.

१० ऑगस्ट २०२४ पासून ‘मुंबई न्याय यात्रे’ची सुरुवात करण्यात आली. तर आज या यात्रेची सांगता खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झाली. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने ही यात्रा काढली होती. या यात्रेचे नेतृत्व हे खासदार वर्षा गायकवाड करत होत्या. मुंबई महापालिकेतील सुरू असलेली लूट, महायुती सरकारच्या भोंगळ कारभार, कायदा व सुवव्यस्था असे अनेक मुद्दे घेऊन खासदार गायकवाड जनतेपर्यंत गेल्या. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार असे विधान केले आहे.

‘मुंबई न्याय यात्रे’च्या सांगतेवेळी खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, ”मुंबईत पहिल्यांदाच इतकी ऐतिहासिक यात्रा निघाली. मुंबईकरांचे प्रश्न सर्कारपर्यंत पोहोचवण्यासाठी या यात्रेचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. आज यात्रेची सांगता होत असली तरी, हे इथेच संपणार नाही. येणाऱ्या काळात अजून मोठ्या प्रमाणात या यात्रेचे नियोजन करू. या यात्रेच्या माध्यमातून असंख्य लोकांपर्यंत पोहोचता आले. त्यांचे प्रश्न समजून घेता आले. यात्रेच्या माध्यमातून समजलेले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सांगलीमध्ये डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण छान प्रकारे झाले. तसेच सध्या राज्यातील परिस्थिती बघता, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे.”

मुंबई भ्रष्टाचारमुक्त करूनच राहू,
मुंबईकरांना न्याय मिळवूनच देऊ,
त्याशिवाय शांत बसणार नाही,
सत्य-न्यायाचा संघर्ष थांबणार नाही..!
लढा सुरूच राहणार.. लढू आणि जिंकू..!#INDIAJeetega 🇮🇳#MumbaiNyayYatra pic.twitter.com/DV7Zka0cM6 — Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) September 5, 2024

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. तसेच राज्यात महाविकास आघाडीला सर्वात जास्त जागा मिळाल्या. त्यात काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला आहे. सध्याचे राजकारण हे लाडकी बहीण योजना, राजकोट किल्ल्यावरील दुर्घटना, कायदा व सुव्यस्था याचा उडालेला बोजवारा अशा घटनांभोवंती फिरत आहे. मध्यंतरी काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणारी निवडणूक सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासाठी अत्यंत चुरशीची असणार आहे. तर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता कोणाला निवडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Web Title: At mumbai nyay yatra mp varsha gaikwad told this election mva government will come soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 08:12 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly Elction 2024
  • Mumbai News
  • Varsha Gaikwad

संबंधित बातम्या

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर
1

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने
2

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?
3

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?

महाराष्ट्रातील हवा धोक्यात! १७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे; मुंबई, MMR ची स्थिती चिंताजनक
4

महाराष्ट्रातील हवा धोक्यात! १७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे; मुंबई, MMR ची स्थिती चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.